Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी माणूस भांडकुदळ आहे काय?

Webdunia
गुरूवार, 29 ऑक्टोबर 2009 (20:48 IST)
दाक्षिणात्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने आवाज उठवला नि त्यांना टार्गेट केले गेले. तत्पूर्वी, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गुजराती समाजाबरोबरही भांडण निघाले. आता राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात तेच करताहेत. कर्नाटकाशी तर राज्याच्या जन्मापासून भांडतोय. कधी दाक्षिणात्य, कधी उत्तर भारतीय, कधी गुजराती-मारवाडी. कधी कानडी. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर भांडकुदळ म्हणून होते आहे काय?

याचा अर्थ मराठी माणूस स्वतःच्या हक्कांविषयी जास्त जागरूक आहे की स्वतःभोवती रिंगण घालून तो जास्त संकुचित होऊ पहातो आहे? या संकुचितपणामुळेच तो इतरांना दूर लोटू पहातो आहे काय? देश स्वतंत्र व्हावा म्हणून मराठी लोकांचे योगदान इतरांपेक्षा मोठे होते हे कुणीही नाकारणार नाही. पण मग आता आपला प्रांत डोळ्यासमोर ठेवून इतरांशी भांडण उकरून काढण्यातही आपणच जबाबदार आहोत काय? उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळ्यांशीच आपली भांडणे होत आहेत. याचा अर्थ मराठी माणूस खरंच भांडकुदळ आहे काय? तुम्हाला काय वाटतं? हे खरंय की खोटं? मग आपली प्रतिक्रिया खाली नोंदविण्यास विसरू नका.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments