Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांना समजून घेणे कठीण का?

वेबदुनिया
स्त्रियांच्या मनात काय चालले आहे, याचा थांग लागणे फार कठीण असते. लग्नाला पन्नास वर्षे उलटली तरी पतीला आपल्या पत्नीच्या मनात काय चालले आहे, ते सांगता येणार नाही. असे म्हटले जाते ‍की स्त्रियांचे मन कळणे कोणालाच शक्य नाही. कारण त्या कोणत्या गोष्टीवर काय प्रतिक्रिया देतील हे सांगणे फार कठीण असते. शास्त्रज्ञही बर्‍याच वर्षांपासून त्यांच्या मनाचा वेध घेत होते. अखेर त्यांना याचे उत्तर मिळाले आहे.

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार स्त्रियांच्या अनाकलनीय वागण्याला त्यांच्यातील जनुक रचना (जीन्स) रचना जबाबदार असते. समाजात, कुटुंबात, ऑफीसात नेहमी महिलांमध्ये स्पर्धा पहायला मिळते. पण पुरूषांमध्ये मात्र, अशी कोणतीही स्पर्धा सहसा दिसत नाही.

थोडक्यात पुरूषांमध्ये परस्परांबद्दल मत्सराची भावना सहसा नसते. पण स्त्रिया मात्र छोट्या मोठ्या गोष्टींवरही आपल्या महिला मैत्रिणीशी, सहकाऱ्याशी भांडणे करतात. शास्त्रज्ञांच्या मते, पुरूषांची जनुक संरचना सोपी असते, तर स्त्रियांची तितकीच गुंतागुंतीची.

फ्लोरिडा विद्यापीठात यासंदर्भात झालेल्या अध्ययनात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी सांग‍ितले, की स्त्रियांच्या तुलनेत पुरूष फक्त समजदारच नसतात, तर इतरांशी त्यांचे पटकन जमते. त्यांच्यात चांगला ताळमेळही निर्माण होतो.

शास्त्रज्ञांच्या मते स्त्री व पुरूषांमध्ये होणार्‍या आजारांवर वेगवेगळ्या पध्दतीने उपचार करण्याची गरजही यामुळे पुढे आली आहे. स्त्रियांमध्ये असणारी दोन एक्स गुणसुत्रे आणि पुरूषांमध्ये असणारी एक एक्स व एक वाय गुणसुत्रे यांचाही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यानुसार स्त्रियांमध्ये एक जास्त असलेले गुणसुत्र त्यांना जास्त गुंतागुंतीचे बनवितो. पुरूषांकडील एक गुणसुत्र त्यांच्या स्वभावाची रचना सरळ सोपी करतो, असा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments