Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्क अँट होमला बंदी

Webdunia
सोमवार, 28 जुलै 2014 (13:39 IST)
तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात खूप बदल झालेले आहेत आणि त्यामुळे माणसाचे कष्ट वाचले आहेत. अनेक लोकांची कामे कॉम्प्युटरवर केली जात असतात आणि त्यांच्या कंपनीचे सगळे कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्कनी जोडलेले असतात. असा माणूस आपल्या घरात बसून काम करू शकतो. जपानमध्ये अशी एक पाहणी करण्यात आली की, किती लोकांची कामे घरात बसून होऊ शकतात. या पाहणीतून असा निष्कर्ष हाती आला की, बर्‍याच लोकांना ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसते. काही लोकांनी तर केवळ मोबाइल हॅन्डसेटवर आपली कन्सल्टिंग कंपनी चालवलेली आहे. तेव्हा या लोकांनी कुठे तरी ऑफिस घेण्यापेक्षा आपल्या घरात बसून काम केले तर ऑफिससाठी जागा घेण्याचा खर्च वाचेल आणि पेट्रोलची बचत होईल. याहू, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांनी तर आपल्या अनेक अधिकार्‍यांना ऑफिसमध्ये येण्याची गरजच नाही, असे सांगून टाकलेले आहे. याहूच्या सीईओ म्हणून काम करणार्‍या मेरिसा मायर यांनी मात्र या कंपनीची सूत्रे हाती घेतल्याबरोबर पहिला आदेश काढला तो म्हणजे यापुढे घरी बसून कोणाला काम करता येणार नाही.

त्यांच्या या निर्णयामुळे अधिकारीवर्गात खळबळ माजली आहे. घरी बसून कामे करण्याने किती फायदे होतात हे या अधिकार्‍यांनी मायर यांना पटवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पद्धतीचा फायदा विशेषत: महिलांना जास्त होतो. अनेक महिला मुलांकडे लक्ष देऊन, संसारातली आवश्यक कामे करीत करीत कंपनीचे काम करतात. कंपनीत जाण्या-येण्याचा वेळ वाचतो, घरच्या कामाच्या बाबतीतले टेन्शन कमी होते आणि काम चांगल्या प्रकारे करता येते. काही कुटुंबात वृद्ध आजारी लोक असतात. त्यांची शुश्रुषा करीत काम करता येते इत्यादी. मात्र मेरिसा मायर यांचे म्हणणे वेगळे आहे. ज्या ठिकाणी कंपनीतले लोक समोरासमोर बसून काम करतात त्या ठिकाणचे काम जास्त होते, असा त्यांचा दावा आहे. एकंदरीत सध्या अनेक कंपन्यांमध्ये घरी बसून काम करणे योग्य की ऑफिसमध्ये जाऊन काम  करणे योग्य यावर मोठा वाद जारी आहे. भारतातील संवाद तज्ज्ञ अलेक पदमसी, रोहित ठाकूर, चंदा कोरच, नंदिता शहा इत्यादींनी याबाबतीत आपली मते व्यक्त केली असून घरी बसून काम करणेच योग्य असल्याची ग्वाही दिली आहे.  

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments