Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातून

वेबदुनिया
हिंदूंच्या बुद्धीच्या प्रखर शस्त्राला मखमलीच्या आवरणा-प्रमाणे वेढून असलेली त्यांची एक मन:शक्ती म्हणजे कविप्रतिभा. हिंदूंचा धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र हे सर्व कविप्रतिभेच्या पुष्पासनावर शोभत आहे. ज्या भाषेत हे सर्व निर्माण झाले, त्या भाषेचे नाव ‘संस्कृत’ म्हणजे ‘परिपूर्ण’ असे आहे.

या विविध विषयांची प्रतिमासृष्टी संस्कृतमध्ये जेवढी उत्तमरितीने व्यक्त झाली आहे, तेवढी अन्य भाषांमध्ये होऊ शकली नसती. अगदी गणितासारख्या रुक्ष विषयालाही सुस्वर संख्यापाठाने रुची प्राप्त करून दिली आहे.

ही विचक्षण मन:शक्ती आणि द्रष्टय़ा प्रतिभेची भरारी ही हिंदू मनाच्या जडणघडणीची दोन प्रमुख वैशिष्टय़े आहेत. ही दोन मिळून हिंदू राष्ट्रीय चारित्र्याच्या प्राणस्वर निर्माण झाला आहे. बुद्धी आणि प्रतिभेचे हे असे रसायनच एखाद्या वंशाला इंद्रियज्ञानाच्या पलीकडे झेपावण्याची शक्ती देते. लोहछेदील अशी धारदार आणि तरीही लवविली तर मंडलाकार होईल, इतकी लवचिक अशी ही प्रज्ञाच विश्वरहस्याचा वेध घेते.

त्यांनी सोन्यारुप्याच्या अक्षरांत काव्य लिहिले, रत्नांच्या स्वरगीतिका रचल्या, संगमस्वरातून सौंदर्याचे चमत्कार घडविले, रंगांची माया उभी केली आणि स्वप्नसृष्टीतच आढळेल असे तलम पोत आपल्या पार्थिव हातांनी विणले. या सर्वाच्या मागे सहस्त्रावधी वर्षाचा हा बुद्धिप्रतिभेचा दुपदरी हिंदू प्राणस्वर होता.

कला आणि शास्त्रे यांच्यामुळे अगदी घरगुती जीवनातील गोष्टींवरसुद्धा काव्यकल्पनांची आभा झळाळू लागली. इंद्रियस्पर्शच अतिंद्रिय झाले आणि रूक्ष व्यवहारही स्वप्नसृष्टीच्या स्वप्नील रंगांनी शोभू लागला.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments