Dharma Sangrah

या 5 देशात मावळतच नाही सूर्य

Webdunia
किमान २४ तास पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा कालावधी लागतो. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. आपण या ३६५ दिवसांच्या कालावधीला एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि ती याच स्थितीत स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.
 
सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. सूर्याभोवती पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. पण याला जगातील पाच देश अपवाद ठरले असून ३ ते ४ महिने सूर्य यातील काही देशांत मावळतच नाही. त्‍याचीच खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
कॅनडामधील लोकांना रात्र होण्याची दोन महिने वाट पहावी लागते. या देशात ५० दिवसाहून अधिक कालावधी सूर्य मावळण्यास लागतो.
 
नॉर्वे या देशात मे ते जुलै म्हणजेच ७६ दिवस सूर्य मावळत नाही. त्यामुळेच या देशाला लँड ऑफ द मिडनाईट सन असेही म्हटले जाते.
 
स्वीडन या देशात मे पासून ऑगस्ट या कालावधीत सूर्य अर्ध्या रात्री मावळतो आणि सकाळी ४.३० वाजता पुन्हा उगवतो. येथे तुम्ही अर्ध्या रात्री ही सूर्य किरणांचा आस्वाद घेऊ शकता.
 
आइसलँड हा उत्तर युरोपातील अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप देश असून येथे मे ते जून या महिन्यादरम्यान दिवसच असतो.
 
फिनलंड येथे देखील ७३ दिवसच सूर्य प्रकाशित असतो. येथील ७३ दिवस हे अविस्मरणीय असतात. ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार १७३७ नवीन रुग्णवाहिका सुरू करणार

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

नगरसेवकाचा मुलगा तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होता, दक्षिण गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची पडताळणी होणार; बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

साताऱ्यात लोकशाहीची हत्या; मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप

पुढील लेख
Show comments