Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणी वाचवा जीवन वाचवा

Webdunia
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (12:46 IST)
पाणी हे जीवन आहे. हे आपण सगळेच ऐकतच येत आहोत. पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही. सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. हे अमूल्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. आज जर आपण पाणी वाचवले नाही तर येणारी पिढी पाण्यासाठी तरसेल. पाण्याचे अपव्यय केल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात. पाणी वाया जात या कडे कोणाचेच लक्ष नसते. अंघोळी साठी शॉवर चा वापर करतात. त्यामुळे खूप पाणी वाया जात. असे करू नये. इथे आपण पाणी वाया घालवतो आणि दुसरी कडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात.
 
पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार, शेती साठी पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर पीक पण नसेल मग आपण काय खाणार? आपल्या दैनंदिनी व्यवहार देखील पाण्यानेच होतात. पाणी आपल्या जीवनासाठी अति आवश्यक आहे माणूस आपल्या जीवनात काही नसेल तरी राहू शकतो पण प्राणवायू ऑक्सिजन, पाणी आणि अन्न या शिवाय जगू शकत नाही पाणी प्रदूषणाच्या आजारांमुळे लोक मरण पावतात. म्हणून पाणी प्रदूषण होण्यापासून रोखले पाहिजे.
 
पावसाच्या पाण्याला संरक्षित करून आपण पाणी वाचवू शकतो. आंघोळ करताना शॉवर एवजी बादलीचा वापर करू शकतो. पाण्याचे काम झाल्यावर नळ घट्ट बंद करू शकतो. झाडे लावून आपल्या पर्यावरणाला संरक्षित ठेवू शकतो. सार्वजनिक स्थळांवर वाहत असलेल्या नळाला बंद करून पण पाण्याला वाचवू शकतो. लक्षात 
 
ठेवा पाणी देवाची दिलेली देणगी आहे. त्याचा अपव्यय करू नका. पृथ्वीवर याच्या शिवाय जगण्याची कल्पना देखील करता येणं अशक्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा -पाणी नाही तर आपण नाही.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments