Festival Posters

विमानात लठ्ठपणा पडणार महागात

Webdunia
विमान प्रवास करणारांना आपल्यासोबत मर्यादितच सामान घेता येते. त्यापेक्षा अधिक सामान सोबत नेले तर त्या सामानाचे वजन करून जादा सामानावर जादा आकार लावला जातो. म्हणजे जादा सामान नेणे शेवटी महागात पडते. हा जादा दराचा नियम केवळ सामानालाच लागू होतो पण तो माणसालाही लागू झाला पाहिजे. कारण माणसेही कमी जास्त वजनाची असतात. जादा सामानाला जादा दर लावला जातो तसे जादा लठ्ठ प्रवाशांनाजादा तिकीट का लावू नये ? बॅग कितीही वजनाची असो तिचे लगेज आकारताना एका बॅगेला एवढे एवढे तिकिट असे बॅगेमागे तिकीट आकारले जात नाही. माणसाला मात्र या बाबतीत सूट आहे. माणूस जादा वजनाचा असो की कमी वजनाचा असो त्यांना समान तिकीट असते.
 
आता मात्र काही विमान कंपन्या याबाबतीत नवा विचार करायला लागल्या आहेत. माणसाला तिकीट लावताना त्याच्या आकारावरून आणि वजनावर लावले जावे अशी कल्पना सॅमोआ बेटावरच्या विमान कंपनीने मांडली आहे. शेवटी विमान प्रवास आणि वजन यांचा काही संबंध जोडला जात असेल तर तो संबंध तसा माणसाच्या वजनालाही लागू झाला पाहिजे. 
 
या विमान कंपनीने म्हणून माणसांच्या तिकिटाचा एक तक्ता तयार केला आहे. त्यात प्रवासाचे दर माणूस किती लठ्ठ आहे यावरून दाखवले गेले आहेत. तिकिट काढणार प्रवाशाला ऑनलाईन तिकीट काढताना त्याचे वजन नमूद करावे लागेल. वजन वाढले की प्रवासाचे दरही वाढतील. सॅमोआ बेटावर लठ्ठपणा हा मोठाच प्रश्र्न आहे कारण या बेटाचा समावेश जगातल्या वजनदार लोकांच्या टॉप 10 च्या यादीत पहिल्यांदा केला जात असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments