Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपण जर का रात्री काम करीत आहात, तर या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

Webdunia
गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (12:00 IST)
आजच्या काळात बहुराष्ट्रीय (मल्टिनॅशनल)कंपन्यांमध्ये दिवस आणि रात्रीचे अंतर नाहीसे झाले आहेत. लोकं फक्त दिवसातच नव्हे तर रात्री देखील काम करीत आहे. रात्री काम केल्यामुळे आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. या दरम्यान, लहान-सहनं  गोष्टींची काळजी घेतल्याने रात्रपाळीमध्ये देखील निरोगी राहू शकतो. चला तर मग या गोष्टींबद्दल जाणून घेऊ या...
 
रात्रीच्या वेळी काम करताना खाण्या-पिण्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. यावेळी बऱ्याचदा आपल्याला कॉफी पिणे आणि चॉकलेट खावेसे वाटते, परंतु या गोष्टींपासून लांबच राहावं. आहारात वेग वेगळे व्हिटॅमिन, खनिजे, प्रथिनं या वर जोर द्यावे जेणेकरून आपली चयापचय(मेटाबॉलिझम)च्या प्रक्रिया सुरळीत आणि आरोग्यवर्धक असावी.
 
रात्रीच्या वेळी पचनाची क्रिया मंदावते म्हणून या काळात जड जेवण घेणे टाळावे. रात्र पाळी करणाऱ्याची जेवण्याची योग्य वेळ संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंतची आहे. त्यानंतर रात्र पाळी सुरू होते. निरोगी आहारासाठीचे अनेक पर्याय आहेत ज्यांना अवलंबणे चांगले आहे जसे की उकडलेली अंडी, फळांचा रस, कमी साय असलेल्या दह्यासह फळाचे तुकडे, फळांसह शेंगदाणे लोणी इत्यादी.
 
रात्री काम करताना पाण्याची गरज सहसा कमी असते. तरीही पाणी पिण्याचे महत्त्व जाणून घ्या. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरात ओलावा टिकून राहतो आणि झोप पण येणार नाही.
    
रात्रपाळीत काम करणारे सकाळी घरी गेल्यावर झोपतात. असं करणं टाळावं. झोपण्यापूर्वी न्याहारी करा. यामुळे आपण निरोगी राहता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments