rashifal-2026

महात्मा ज्योतिबा फुले यांचा संक्षिप्त परिचय

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (10:00 IST)
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२० रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आई वडिलांचे नाव गोविंदराव व चिमणाबाई होते. त्यांचे कुटुंब उदार निर्वाहासाठी माळ्याचे काम करत असत. ते साताऱ्यामधून पुण्याला फुले आणून त्याचे गजरे बनवून विकायचे म्हणून ते फुले म्हणून ओळखले जात असे नंतर त्यांना फुले नावानेच संबोधित केले जात असे. 
 
बाल्यपणापासूनच त्यांची बुद्धी कुशाग्र व तल्लख होती. त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. ते कुशल विचारवंत, क्रांतिवीर, समाजसेवी, चांगले लेखक, व कुशल दार्शनिक होते. 
 
ते सन १८४० रोजी सावित्रीबाईशी विवाहबद्ध झाले. त्या काळी महाराष्ट्रात धर्मसुधारक आंदोलनाची तीव्रता होती, जातिप्रथेचा विरोध केला जात होता. त्या साठी प्रार्थना समाजाची स्थापना केली गेली त्याचे कार्यवाहक प्रमुख गोविंदराव रानडे आणिक आर जी भांडारकर होते.
 
त्या वेळी महाराष्ट्रात जातिवाद बरोबरच स्त्री शिक्षा सारखे गंभीर विषय ज्वलंतशील होते. महात्मा यांनी त्या कुप्रथेला संपविण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी स्त्री शिक्षेला महत्त्व देऊन पुण्यात प्रथम मुलींसाठी शाळा उघडून स्त्री शिक्षण सुरू केले. त्यासाठी त्यांना समाजात विरोध पत्करावा लागलाच पण त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण केले व समाजात एक नवीन आदर्श स्थापित केले. त्यांचे विचार सर्वत्र पसरू लागले.
 
अस्पृश्यता, जातीवाद व सर्वांना सामान अधिकार स्त्री पुरुष समानता ह्या मताचे ते होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्यांवर कार्य केले त्यासाठी त्यांना "महात्मा" असे नाव मिळाले त्यांना "महात्मा" म्हणूनच ओळखले जाते.
 
२८ नोव्हेंबर १८९० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. महात्मा फुले आज पण त्यांचे विचारायच्या रूपात जिवंत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना धमक्या, भारताने कडक कारवाईची मागणी केली

आचारसंहिता लागू होताच बीएमसीने कारवाई सुरू केली, मुंबईत राजकीय पोस्टर्स आणि बॅनर हटवले

महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठीत घोषणा अनिवार्य करावी; नाना पटोलेंची पंतप्रधान यांना मागणी

चंद्रपूरमधील हनुमान मंदिरात मधमाशांचा हल्ला, एका भाविकाचा मृत्यू

माणिकराव कोकाटेंना अटक होणार?

पुढील लेख
Show comments