Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुःख वाळुवर लिहायला शिकावे आणि चांगुलपणा दगडावर कोरायला!

Webdunia
मंगळवार, 16 जून 2020 (14:34 IST)
एकदा दोन मित्र वाळवंटातुन प्रवास करत असतात. प्रवास करत असताना एकदा त्यांच्यात काही कारणावरुन विवाद होतो. यामध्ये एक मित्र दुसऱ्याच्या थोबाडीत मारतो. मार खाल्लेला मित्र दुःखी होतो पण काहीही न बोलता तो वाळुमध्ये लिहितो, "आज माझ्या जिवलग मित्राने मला थोबाडीत मारले."
 
प्रवास करत करत ते पुढे जातच राहतात. त्यांना समुद्र लागतो. समुद्र बघुन ते त्यात स्नान करायचे ठरवतात. पण  मार खाल्लेला मित्र पाण्याच्या भोवऱ्यात अडकतो आणि बुडायला लागतो पण त्याचा मित्र त्याला वाचवतो. या प्रसंगातुन सावरल्यावर काही दिवसांनी तो दगडावर काही अक्षरे कोरतो.  "आज माझ्या जिवलग मित्राने माझे आयुष्य वाचवले." 
 
ज्याने त्याला मारले व वाचवले असते असा जिवलग मित्र त्याला विचारतो, "मी तुला दुःखी केल्यावर तु वाळुवर लिहिलेस आणि आता दगडावर कोरलेस असे का?"
 
मित्र उत्तरतो- 
"जेव्हा आपल्याला कोणी दुःखी करते तेव्हा ते वाळुवर लिहावे कारण क्षमेचा वाऱ्याने ते आपोआप पुसले जाते पण जर कोणी आपल्यासाठी चांगले केले तर आपण दगडावर कोरुन ठेवावे जेणे करुन कुठलाच वारा ते नष्ट करु शकणार नाही."

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments