Publish Date: Tue, 23 Jun 2020 (11:50 IST)
Updated Date: Tue, 23 Jun 2020 (11:55 IST)
सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण...
आचार्य विनोबा म्हणतात की,
आकाशातून पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो.
मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही.
तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जाते.
कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो...
पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार
यावर त्याचं अस्तित्व व त्याची पद प्रतिष्ठा अवलंबून असते.