Festival Posters

राष्ट्रीय आंबा दिवस 2024

Webdunia
सोमवार, 22 जुलै 2024 (13:15 IST)
22 जुलैला भारतात राष्ट्रीय आंबा दिवस साजरा करतात. कारण हे उष्णकटिबंधीय फळ एका गोड घासामध्ये चविष्ट चव आणि पोषण प्रदान करते. तर चला जाणून घेऊ या राष्ट्रीय आंबा दिवसाचे महतव काय आहे?
  
राष्ट्रीय आंबा दिवस-
भारतामध्ये कमीतकमी 5,000 निर्माण झालेला आंबा आज देखील अनेकांच्या आवडीचे फळ आहे. आंब्याच्या बिया सोबत आशिया मधून मध्य पूर्व, पूर्व आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका पर्यंत कमीतकमी 300 या 400 ई. स. मध्ये पोहचल्या. फळांचा राजा आंबा याबद्दल सांगितले जाते की, आंबा जीवनात समृद्धी आणतो. ज्यामध्ये भौतिक संपदा देखील सहभागी आहे. 
 
जगभरामध्ये आंब्याच्या अनेक प्रजातींचे उत्पादन घेतले जाते. सरासरी, एक आंब्याचे झाड 131 फूट पर्यंत उंच असू शकते. आंब्याचे झाड अनेक वर्षांपर्यंत टिकणारे झाड आहे. ज्यांमध्ये काही झाड 300 वर्षापूर्वीचे आहे. याशिवाय, आंबा हे फळ वेगवेगळा आकार, रंग आणि चवीमध्ये येतो. जो शेताच्या आधारावर असतो.
 
आंब्यामध्ये पोषक तत्व भरपुर प्रमाणात असतात. तुम्हाला माहित आहे का संत्रीपेक्षा आंब्यामध्ये अडीच पट व्हिटॅमिन ए, बी-6 आणि के, अँटीऑक्सीडेंट, पोटॅशियम आणि डाइटरी फाइबर भरपूर प्रमाणात असते.  
 
राष्ट्रीय आंबा दिवसाचा इतिहास-
आंब्याचा आणि भारताचा खोलवर संबध आहे. आंब्याची शेती सर्वात आधी भारतात 4,000 वर्षांपूर्वी केली गेली होती. तसेच या फळाला त्याचे नाव संभवतः मलयालम मन्ना कडून मिळाले, ज्याला पुर्तगालियांनी 15 व्या शतकात केरळ मध्ये पोह्चल्यावर मंगा मध्ये स्वीकारले होते. आंबा हा भारतीय लोककथांशी जोडलेला आहे.असे सांगितले जाते की, भगवान बुद्ध यांना एक आंब्याचा बगीचा देण्यात आला होता. 1987 मध्ये, भारताच्या राष्ट्रीय बाग बोर्डने आंब्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी आंतराष्ट्रीय आंबा महोत्सवची अवधारणा सादर केली. मागील काही वर्षांमध्ये, हे वार्षिक आयोजन एक बहुप्रतीक्षित उत्सव रूपामध्ये विकसित झाले. ज्यामध्ये देशातील सर्व लोक सहभागी झाले.
 
आंबा खाण्याचे फायदे-  
आंबा या फळामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. जे आरोग्याला अनेक लाभ देतात. आंबा खाल्याने पाचन तंत्र चांगले राहते. फाइबर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. अपचन, गॅस, ब्लोटिंग या समस्या दूर राहतात.
 
व्हिटॅमिन सी असल्यामुळे आंबा रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवतो. ज्यामुळे आपले अनेक रोगांपासून रक्षण होते. व्हिटॅमिन सी एक अँटीऑक्सीडेंट आहे, जे रोग प्रतिकातमकशक्ती मजबूत करून इंफेक्शन, गंभीर आजार यांपासून शरीर सुरक्षित ठेवते.
 
तसेच पोटॅशियम असल्यामुळे उच्च रक्तचाप दूर राहतो. जर तुम्हाला उच्च रक्तचाप असेल तर आंबा सेवन करावा. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

भारतात १०० नवीन सैनिक शाळा सुरू होणार, एनसीसी कॅडेट्सची संख्या वाढणार

कोलकाता नाईट रायडर्सचा आणखी एक भारतीय वेगवान गोलंदाज जखमी; संघाच्या अडचणींमध्ये भर पडली

उद्धव ठाकरे भोंदू बाबांवर टीका करत म्हणाले-हे काळ्या जादूगारांचे सरकार आहे; आता महाराष्ट्राचा कारभार लिंबू आणि मिरची चालवणार का?

ट्रम्प यांचा यू-टर्न! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले

पुढील लेख
Show comments