Dharma Sangrah

Vinoba Bhave death anniversary व्यक्ति‍विशेष : विनोबा भावे

Webdunia
बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (09:29 IST)
Vinoba Bhave death anniversary विनोबा भावे यांचा जन्म महाराष्ट्रातील कुलाबा (आता रायगड) जिल्ह्यातील गागोडे गावात 11 सप्टेंबर 1895 रोजी एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव आणि आईचे नाव रुक्मणी होते. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा खोलवर प्रभाव होता. भगवद्गीता, महाभारत आणि रामायण यांसारख्या धार्मिक ग्रंथांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.
 
विनोबा भावे म्हणाले की, त्यांना गांधीजींमध्ये हिमालयातील शांतता आणि बंगालचा क्रांतिकारी आवेश दिसतो. गांधीजींनी विनोबा भावे यांना त्यांचे विचार चांगले समजले, असे म्हणत त्यांचे कौतुक केले होते. गांधीजींनी 1940  मध्ये ब्रिटिश सरकारच्या युद्ध धोरणाविरुद्ध राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी विनोबा भावे यांची निवड केली होती.
 
थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांचा आज जन्म‍दिन. कोकणातील रायगड जिल्ह्यात गागोदे या पेण तालुक्यातील गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट 7 जून 1916 रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.
 
त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पातंलजोगाचे शिक्षण घेतले. पुढे 1921मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून 8 एप्रिल 1921 रोजी महात्माजींच्या 1940 त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते. 1951 ते 53 हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढलेल्या विनोबांनी 15 नोव्हेंबर 1982 रोजी तेथेच आपली देहयात्रा संपविली. सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात बलात्कार, आरोपीला अटक

ओला, उबर, रॅपिडो ॲप्स कधीही बंद होणार, सरकारने नोटीस जारी केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार, माजी आमदार आसिफ शेख यांचा भाजपला सवाल

अमरावतीत उष्णतेची लाट, तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले

पुढील लेख
Show comments