rashifal-2026

अभिजात मराठी दर्जा म्हणजे काय? भारतात किती अभिजात भाषा आहेत?

Webdunia
गुरूवार, 27 फेब्रुवारी 2025 (07:04 IST)
2005 साली संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगु, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया भाषेला अभिजात दर्जा मिळाला होता. त्यानंतर नऊ वर्षांनी केंद्र सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. भारतात आता एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.
 
अभिजात मराठी दर्जा म्हणजे काय?
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असायला हवी. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावे, अनुवादित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे, अशा सर्वसाधारण अटी आहेत.
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबरमध्ये म्हटले की “मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो."
 
भाषा अभिजात कशी ठरते?
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार आहे. यासाठी अटी म्हणजे भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे किमान 1500-2000 वर्षं जुना असायला हवा. भाषेत मौल्यवान प्राचीन साहित्य असावे. भाषा दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी घेतली नसून अस्सल साहित्यिक परंपरा असायला हवी. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
ALSO READ: Marathi Bhasha Gaurav Din 2025 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा
मराठी भाषेचे किती प्रकार आहेत?
भारतीय विद्वान बोलल्या जाणाऱ्या मराठीच्या ४२ बोलीभाषांमध्ये फरक करतात. इतर प्रमुख भाषिक क्षेत्रांना लागून असलेल्या बोलीभाषांमध्ये त्या भाषांमध्ये अनेक समान गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते प्रमाणित बोलल्या जाणाऱ्या मराठीपेक्षा वेगळे आहेत.
 
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे फायदे काय?
अभिजात भाषांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं. या भाषांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठामध्ये अध्यासनांची स्थापना करणं. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं ज्याने ग्रंथालयांना पाठबळ मिळतं. महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करता येईल. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत मिळेल. अभिजात भाषेतील दोन अभ्यासकांना दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटल होतं की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील. विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
ALSO READ: कुसुमाग्रज Kusumagraj (विष्णु वामन शिरवाडकर) निबंध मराठी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शिवनेरी किल्ल्यावर प्रचंड गर्दी, एक भाविक घसरला ज्यामुळे इतर जण पायऱ्यांवर पडले; पोलीस म्हणाले- चेंगराचेंगरी झाली नाही

LIVE: रोहित पवार यांच्या 'षड्यंत्र'च्या दाव्यांमुळे विमान वाहतूक मंत्रालय संतापले

मथुरा येथे भरधाव वेगाने जाणारी कार डिव्हायडरला धडकून कालव्यात पडली, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; ४४ नक्षल स्मारके पाडली

१३ बैठका आणि सीसीटीव्ही फुटेजचा कच्चा रेकॉर्ड...राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर रोहित पवारांचा खळबळजनक दावा

पुढील लेख
Show comments