rashifal-2026

रथ सप्तमीचे महत्व

Webdunia
शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (18:30 IST)
माघ शुद्ध सप्तमीला रथ सप्तमी असे म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रियां उपवास करतात. दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथ सप्तमी पर्यंत उपवास धरतात. रथ सप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृन्दावनाजवळ रांगोळी काढतात. त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात. सूर्याला तांबडे गंध, तांबडी फुले अर्पित करतात. नैवेद्यात खीर ठेवतात. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांवर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाई पर्यंत उकळत ठेवतात. 
 
रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. अदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथ सप्तमी साजरी केली जाते. दक्षिण भारतात तर हा सण खूप उतसाहाने साजरा होतो. संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसांचे विशेष महत्व आहे. सूर्याची उपासना पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे.
 
दक्षिण भारतातील समुद्रतटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन "ब्रह्मोत्सव" साजरा केला जातो. दक्षिण भारतातील वास्तव्य असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो. भारताचे  विविध प्रांत  बिहार,झारखंड,ओडिसा, मध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shubh Somwar Status Photo शुभ सोमवार

Shubh Ravivar Status शुभ रविवार

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

रविवारी माघ पौर्णिमेला या १० दानांपैकी एक करा आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments