suvichar

वटपौर्णिमा कथा मराठी

Webdunia
शुक्रवार, 21 जून 2024 (07:59 IST)
प्रसिद्ध तत्त्ववेत्ता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळाले नाही. यासाठी त्यांनी 18 वर्षे कठोर तपश्चर्या केली, त्यानंतर सावित्रीदेवींनी कन्यादानाचे वरदान दिले. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली. ती खूप रुपवान होती. योग्य वर न मिळाल्याने राजा दु:खी असायचा. राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले. जंगलात तिला सत्यवान भेटला. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता.
 
ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले. सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे कळल्यावर आई-वडिलांनी तिला खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही. तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले.
 
सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता. आई-वडिलांची पूर्ण काळजी घेत असे. सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती, ती देखील आपल्या आंधळ्या सासू- सासर्‍यांची सेवा करायची.
 
सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता. जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली. तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला. नारदमुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली.
 
रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला, म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली पडला. सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेऊन त्याला मिठी मारायला सुरुवात केली. तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली. सावित्रीही यमराजाच्या मागे मागे चालू लागली.
 
त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो, तिथे मला जायलाच हवं. वारंवार नकार देऊनही सावित्री मागे-पुढे चालत राहिली. सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले. एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू- सासऱ्यांना डोळे दिले, दूसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले. तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतानप्राप्तीचे वर मागितले. कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला. वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला. सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे. हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले. सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता.
 
सत्यवान जिवंत झाला, आई-वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले. अशा प्रकारे सावित्री-सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

Shivray Aarti छत्रपती शिवाजी महाराज आरती मराठी

खारचा अचानक घरात प्रवेश किंवा स्वप्नात दिसणे शुभ आहे की अशुभ; जाणून घेऊया....

Marathi Essay On Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज: आमचे स्फूर्तिस्थान

Phulera Dooj 2026: वैवाहिक जीवनात विलंब किंवा ताण? फुलेरा दूज रोजी हे ५ ज्योतिषीय उपाय करुन पहा

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments