suvichar

चित्रपट समीक्षा : डोंबिवली रिटर्न

Webdunia
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (16:13 IST)
जगण्यासाठी काय आवश्यक असतं, पैसा की नीतिमत्ता? प्रत्यक्षात या दोन्हीची समप्रमाणात आवश्यकता असते. या दोन्हीचा समतोल साधला गेला की आयुष्य सुखा-समधानाने शांतपणे जगता येतं. अर्थात केवळ नीतिमत्ता असेल आणि पैसा नसेल, तर रडतखडत का होईना पण जगता येतं. परंतु केवळ पैसा असेल आणि नीतिमत्ता नसेल, तर मात्र जगण्याची जी काही वाताहत किंवा परवड होते तिला तोड नसते. जो 'डोंबिवली रिटर्न'मधील अनंत वेलणकरचा होतो.
 
खरंतर अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) म्हणजे एकदम पापभिरु माणूस. मूळचा विदर्भातला पण, आता डोंबिवलीला बायको (राजेश्र्वरी सचदेव), मुलगी आणि भावाबरोबर (अमोल पराशर) राहाणारा. नोकरीला मंत्रालयात जनसंपर्क विभागात. मात्र मंत्रालयात काम करूनही वरकमाईची कसलीही अपेक्षा न ठेवणारा आणि कुणी द्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यापासून चार हात लांब पळणारा. एकूण अनंत वेलणकर म्हणजे नीतिमत्तेचा सगुण-साकार पुतळा, आहे त्यात समाधान मानून जगणारा, कुटुंबसुख पुरेपूर उपभोगणारा. मात्र एक दिवस त्याच्या हाताला अचानक एक पुरावा लागतो. राजकारणात दबदबा असलेल्या दादासाहेबांनी कुणा एकाची हत्या घडवून आणल्याचा. वास्तविक दादासाहेब अनंतचे आवडते नेते. त्याची त्यांच्यावर अतीव श्रद्धा. त्यामुळेच तो आपल्याकडील पुरावा दादासाहेबांना नेऊन देतो. त्याबदल्यात दादासाहेब त्याला भरपूर पैसे, मुंबईत घर... असं बरंच काही देऊ करतात. परंतु पापभिरू आणि सच्छील असलेला अनंत वेलणकर सगळ्याला नकार देतो. पण हा नकारच त्याला भारी पडतो. कारण नीतिवान माणूसच कुण्याही राजकारण्यासोरचीसगळ्यात मोठी समस्या असतो. साहजिक दादासाहेब आपल्या माणसांकरवी असं काही मायाजाल विणत जातात की अनंत त्यात अडकत तर जातोच, परंतु पैशांपासून चार हात लांब असलेला अनंत पैशांच्या मागे लागतो आणि त्यात त्याचं स्वतःचं स्वास्थ्य तर हरवतंच, वर कौटुंबिक सुखालाही तो दुरावतो. अनंतच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, तो होत्याचा नव्हता होतो. आयुष्यात पैसा नसताना सुखात जगणार्‍या अनंताचं, आप पैसा आल्यावर नेमकं काय होतं, ते कळायला हवं असेल तर हा सिनेमा पाहाण्याशिवाय गत्यंतर नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

"मराठी येत नसेल तर परवाना रद्द होईल," अभिनेता रितेश देशमुखने प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला

मे महिन्यात गोवा ट्रिप फायदेशीर का नाही?

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता जय सोमनाथ'साठी एकत्र आले

लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली

रणवीर सिंगच्या शाही शैलीच्या 'धुरंधर'ने नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments