Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दान देण्यापूर्वी लक्षात ठेवा हे नऊ नियम

Webdunia
प्रत्येक धर्मात दानाची महत्ता मानली आहे. पण दान देण्याचेही काही नियम आहे. त्या नियमांप्रमाणे दान केल्याने पुण्य मिळतं.
 
1. माणसाने आपल्याद्वारे प्रामाणिकपणे कमावलेल्या कमाईचा दहावा भाग सत्कर्मांमध्ये लावाला हवा. जो मनुष्य आपल्या पत्नी, पुत्र आणि कुटुंबाला दुखी करून दान करतो, तो जीवितपणे आणि मृत्यूनंतरही दुखी राहतो.

2. स्वत: जाऊन दिलेले दान उत्तम आणि घरी बोलवून दिलेले दान मध्यम फलदायी असतं. गाय, ब्राह्मण आणि रूग्णाला दान देताना दान देऊ नये असा सल्ला देणारा दुखी राहतो.


 
3. तीळ, कुश, पाणी आणि तांदूळ हे हातात घेऊन दान केले पाहिजे अन्यथा या दानावर दैत्य अधिकार करून घेतात. पितरांना तिळाबरोबर तर देवांना तांदुळाबरोबर दान केले पाहिजे.

4. दान करणार्‍यांनी पूर्वाभिमुखी होऊन दान केले पाहिजे आणि घेणार्‍यांना उत्तराभिमुखी होऊन दान ग्रहण करायला हवे. असे केल्याने दान देणार्‍याचे आयुष्य वाढतं आणि घेणार्‍यांचे आयुष्य क्षीण होत नाही.


 
5. दीन, निर्धन, अनाथ, मूक, विकलांग आणि रोगी मनुष्याच्या सेवेसाठी जो धन खर्च करतो त्याचा पुण्य महान ठरतं.

6. अन्न, पाणी, अश्व, गाय, वस्त्र, शय्या, छत्र आणि आसन या आठ वस्तूंचे दान मृत्यूनंतर येणार्‍यां कष्टांपासून मुक्ती देतं.


 
7. गाय, घर, वस्त्र, शय्या आणि कन्या हे दान एकाच व्यक्ती केले पाहिजे. रुग्णांची सेवा करणे, देवतांचे पूजन करणे आणि ब्राह्मणांचे पाय धुणे हे गाय दान समांतर आहे.

8. विद्याहीन ब्राह्मणांना दान देऊ नये. याने ब्राह्मणाला हानी होते.


 
9. गाय, सोने, चांदी, रत्न, विद्या, तीळ, कन्या, हत्ती, अश्व, शय्या, वस्त्र, भूमी, अन्न, दूध, छत्र आणि आवश्यक सामुग्रीसह या 16 वस्तू दान करणे महादान मानले जातात. 

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments