Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवपूजा सकाळीच का करतात ?

वेबदुनिया
देवा पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते. 

देवाची पूजा सकाळीच का केली जावी, यामागे शास्त्र आहे. सकाळी आपण जेव्हा उठतो, तेव्हा आपण ताजे तवाने असतो. शरीर थकलेलं नसतं. त्यामुळे सबंध दिवसामध्ये सकाळचीच वेळ उत्कृष्ट असते. सकाळी आपलं मनही शांत असतं. मनात विचारांची गर्दी नसते. त्यामुळे मन एकाग्र करून आपण व्यवस्थित पूजा करू शकतो.

एकदा दिवस सुरू झाला, की आपली धावपळ सुरू होते, दगदग होते. यामुळे मनात वेगवेळे विचार सुरू होतात. काम करून आपण थकलेलो असतो, अंगातील उत्साह कमी झाला असतो. अशावेळी देवाच्या पुजेच्यावेळी आपण एकाग्र चित्ताने पूजा करू शकत नाही. सकाळी पूजा केल्यामुळे मनात पवित्र विचार येतात. मन शांत होतं आणि समाधान लाभतं. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. या सर्व कारणांमुळे शास्त्रांत ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी पूजा करण्यास सांगितलं आहे. 

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

Show comments