Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका!

Webdunia
शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (23:21 IST)
तुमच्या मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस आहे. तुम्ही त्यासाठी त्यांना शुभेच्छा देता. मात्र, या शुभेच्या देताना थोडा विचार करा आणि रात्री १२ वाजता शुभेच्छा देण्याचे टाळा. रात्री १२ वाजता शुभेच्छा देण चांगले नाही. त्या त्यांना फलदायी ठरत नसतात. त्यामुळे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा बिनकामाच्या ठरतात. मग शुभेच्छा कधी द्यायच्या असा प्रश्न पडला ना...मग हे जरूर वाचा.
 
आपल्या जीवनातील जन्मदिन हा अतिशय महत्वाचा दिवस असतो. म्हणूनच या दिवशी आपण खूप आनंदी असतो. वाढदिवस साजरा करतो. काही जण आपला वाढ दिवस गरीब कुटुंबांसोबत किंवा मुलांबरोबर साजरा करतात. तर कोणी वाढदिनी भेटवस्तू किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करतात. तर अनेक जण समाजोपयोगी काम करतात. रक्तदान करतात. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी व्यक्ती भावनिकरित्या आपल्याशी जोडलेला असतो. 
 
आजकाल नातेवाईक असू द्या की जवळच्या मित्र-मैत्रिणी त्यांच्या वाढदिवशी आपण शुभेच्छा देतो. परंतु लवकर शुभेच्छा देण्याच्या नादात रात्री १२ वाजता शुभेच्छा देण्याची पद्धत रूढ होताना दिसत आहे. विशेषत: तरूणांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.

भारतीय शास्त्र आणि धर्म समजून घेतले तर ध्यानात येईल की, ही पद्धत खूपच चुकीची आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास वातावरणात रज आणि तम गुणांचे प्राबल्य असते. यावेळी नकारात्मक शक्तिदेखील अधिक प्रभावी असतात. त्यामुळे रात्री १२ वाजता दिलेल्या शुभेच्छा लाभदायी नसतात.
 
हिंदू संस्कृतीनुसार दिवसाची सुरूवात सूर्योदयाने होते. सकाळची वेळ ही ऋषी मुनींच्या साधनेची असते. यावेळी वातापणात सात्विकता अधिक असते. सूर्योदयाच्यावेळी दिल्या गेलेल्या शुभेच्छा अधिक फलदायी असतात. त्यामुळे वाढदिवासाच्या शुभेच्छा या १२ वाजता न देता सकाळी देणे चांगले असते. 

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढील लेख
Show comments