Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्न करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या

लग्न करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या
Webdunia
शनिवार, 9 जुलै 2022 (12:31 IST)
गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी केला जाणारा संस्कार म्हणजे विवाहसंस्कार होय. याला 16 संस्कारात स्थान दले आहे. याचा मुख्य उद्देश्य 'जीवनाला संयमाने बांधून अपत्यसुख प्राप्ती करून जीवनातल्या सगळ्या ऋणांपासून मुक्त होण्यासाठी व मोक्षासाठी कर्म करावे', हा आहे.
 
यासाठीच लग्नासंबंधी काही नियम बनवले गेले आहेत. ते असेः
 
1. वधू व वर सगोत्रीय (एका गोत्राचे) नकोत.
2. वधूचे गोत्र व मुलाच्या (वराच्या) आजोळचे गोत्रही एक नको (इथे कुळ ही संकल्पना अपेक्षित आहे).
3. दोन सख्ख्या बहिणींचा विवाह सख्ख्या भावांशी करणेही शास्त्राने निषिद्ध मानले आहे.
4. दोन भावांच्या दोन बहिणींच्या किंवा बहीण भावांच्या लग्नात 6 महिन्यांचे अंतर असावे (एका मांडवात 2 सगोत्रीय विवाह नकोत).
5. घरात विवाहानंतर 6 महिन्यांच्या आत डोहाळजेवण, जावळ, मुंज या सारखी मंगलकार्ये करू नयेत. पण जर 6 महिन्यात संवत्सर बदलत असेल तर कार्य केले जाऊ शकते.
6. लग्न किंवा इतर मंगलकार्यात श्राद्धादी कर्मे करू नयेत असे शास्त्र सांगते.
7. जर ग्रहमुख (ग्रहयज्ञ) झाल्यावर वधू किंवा वराच्या घरात कोणाचा मृत्यू झाल्यास वधुवर व त्यांचे मातापिता यांना सुतक लागत नाही. तसेच ठरलेल्या तिथीला लग्न केले जाऊ शकते.
8. वाङनिश्चय किंवा साखरपुड्यानंतर परिवारात कोणाचा मृत्यू झाल्यास सुतक संपल्यावर किंवा सव्वा महिन्यानंतर लग्न करण्यास कोणताही दोष नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa Recipe Amrakhand घरीच तयार करा आम्रखंड

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात?

गुरुवारचा हा सोपा उपाय तुम्हाला श्रीमंत करेल, आर्थिक संकट दूर होईल

आरती गुरुवारची

Pradosh Vrat, या दिवशी काय खावे आणि काय नाही जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments