rashifal-2026

माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या पायाशी का बसते, ग्रहांशी संबंधित हे कारण आहे खूप मनोरंजक .

Webdunia
शुक्रवार, 26 मे 2023 (08:28 IST)
सनातन धर्मात अनेक देवतांची पूजा केली जाते आणि त्यांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेशी संबंधित काही पौराणिक कथा तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. याशिवाय तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे चित्र लक्षपूर्वक पाहिले असेल. ज्यामध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णूच्या पायाजवळ बसलेली दिसते. तिला या मुद्रेत बसलेले पाहून तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूंच्या चरणांजवळ बसलेली दिसते त्यामागे असे काय कारण आहे? ते जाणून घ्या.   
 
दोन्ही एकमेकांना पूरक
धार्मिक मान्यतांनुसार, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे एकमेकांना पूरक म्हणून वर्णन केले गेले आहेत. असे म्हणतात की ज्यांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जातो, त्या व्यक्तीचे भाग्य उजळते.
 
धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूसोबत बैकुंठ धाममध्ये निवास करते. जिथे एकीकडे भगवान विष्णूला विश्वाचे रक्षणकर्ते मानले जाते, तर दुसरीकडे माता लक्ष्मी विश्वाची नियंत्रक असल्याचे म्हटले जाते.
 
नारद मुनींचे आगमन
धार्मिक कथांनुसार, एके काळी. देव ऋषी नारद लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यावेळी भगवान विष्णू झोपेत होते, त्यामुळे देव ऋषी नारदांनी त्यांची वाट पाहणे योग्य मानले. या दरम्यान जेव्हा त्यांनी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंच्या पायाशी बसलेले पाहिले तेव्हा नारद मुनींच्या मनात प्रश्न निर्माण झाला की माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणी का बसते?
 
हे मुख्य कारण आहे
प्रचलित समजुतीनुसार, माता लक्ष्मीने नारद मुनींना सांगितले की देव गुरु बृहस्पती स्त्रियांच्या हातात राहतात आणि राक्षस गुरु शुक्राचार्य पुरुषांच्या पायात वास करतात. यामुळे शुभता पसरते, याशिवाय धनही मिळते. याच कारणामुळे देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळच बसत नाही तर हाताने त्यांचे पाय दाबते.
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Annapurna Jayanti 2025: आज अन्नपूर्णा जयंती, या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

Datta Jayanti 2025 श्री दत्तात्रेयांना प्रिय असलेले आणि नैवेद्य म्हणून खास तयार केले जाणारे पदार्थ

श्रीदत्तगुरू भक्तांची पंढरी श्रीक्षेत्र गाणगापूर

भगवान दत्तात्रेयांचे हे ४ मंत्र जीवनातील सर्व संकटे दूर करतील...

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments