suvichar

कच्च्या भाज्या खाऊ नका, महागात पडू शकतं

Webdunia
बुधवार, 19 मे 2021 (18:27 IST)
कोरोनाकाळात लोकांनी आपली रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी आहारात बदल केले आहे. लोकांचा कल सध्या आरोग्यवर्धक आहार खाण्याकडे वाढत आहे. व्यायामाला आणि योगाला त्यांनी आपल्या दिनचर्येत समाविष्ट केले आहेत. परंतु असं म्हणतात की अपूर्ण ज्ञान नेहमी धोकादायक असतो. लोक आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी  फळे आणि भाज्यांचे सेवन करत आहे. त्यासाठी कच्च्या भाज्या देखील खात आहे. 
वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक या दोन्ही दृष्टिकोनातून हे शरीरासाठी घातक आहे. कित्येक लोकांचा असा विश्वास आहे की कच्चे फळ आणि भाज्या खाण्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं. तसेच भाज्या शिजवल्याने त्यांचा मधील गुणधर्म नाहीसे होतात .
 
कच्च्या गोष्टी खाऊ शकतो का? 
कच्चे फळ, सॅलड आणि शेंगदाणे खाऊ शकतो.परंतु भाज्यांना नेहमी शिजवूनच खावे. कच्च्या भाज्या आणि फळे कमीत कमी तीन पाण्याने धुतलेले असावे. फळे आणि भाज्या आपण मिठाच्या पाण्यात देखील धुवू शकता. जेणे करून त्यावर चिटकलेले बारीक जंत आणि घाण निघून जावे. 
 
पचनसंस्थेसाठी धोकादायक - 
शिजवलेले अन्न खावे याची तज्ञांकडून शिफारस केली जाते कारण ते सहज पचतं. शिजवलेलं अन्न खाल्ल्याने पाचन तंत्रालाही कोणती इजा होत नाही. परंतु कच्च्या भाज्या खाल्ल्याने पाचन तंत्रावर जास्त परिणाम होतो. कच्च्या भाज्या पचविणे अवघड असतं.  या मुळे बर्‍याच वेळा पोटात दुखणे देखील सुरू होते. भाजी थोडी शिजवून   त्यात थोडी हळद आणि थोड मीठ घालून खाऊ शकता.
बर्‍याचवेळा  पाण्यात कच्च्या भाज्या धुतल्यावर देखील त्यात बारीक किडे राहतात, म्हणून डॉ आणि तज्ञांनी भाज्या शिजवून खाण्याचा सल्ला देतात. बर्‍याच वेळा कच्च्या खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे ते पोटात कोणत्याही प्रकारचे संक्रमण करू  शकतात. एवढेच  नव्हे तर स्टोन होण्याचा धोकादेखील असू शकतो. म्हणून, सॅलड ,शेंगदाणे आणि फळे व्यतिरिक्त, अन्न शिजवून आणि उकळवूनच खावे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

Hanuman Jayanti Special मारुतीरायाला प्रिय असलेल्या खास नैवेद्य पाककृती

उष्माघाताच्या वेळी हे फळ खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत होते आणि आराम मिळतो

Career in Aviationr Industry : एविएशन इंडस्ट्री मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवा

उष्माघातापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे ७ सोपे घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments