Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री उशिरा जेवता?

Webdunia
लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे हे वचन आपण लहानपणी ऐकलेले असते. घरातील आजी-आजोबा रात्री लवकर जेवत असल्याचेही पाहिले असेल. आजही खेडेगावात रात्री 8 च्या सुमारास जेवतात. पण शहरात परिस्थिती वेगळी आहे. शहरांतील बरेचजण रात्री 10 आणि त्यानंतर जेवतात. नाईटशिफ्टमुळे काहींच्या जेवणाच्यावेळा अनिश्चित असतात. मात्र, आरोग्यशास्रानुसार रात्री उशिरा जेवण करणे हे अयोग्य मानले गेले आहे.
 
चयापयच क्रियेवर परिणाम- चयापचय क्रिया वेगवान असेल तर शरीरातील चरबी वेगाने जळून आपण सडपातळ राहू शकतो. मंद वेग असलेल्या चयापचय क्रियेच्या व्यक्तींध्ये चरबीचे ज्वलन होण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे काही व्यक्ती जाड होतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जाऊन आपली झोप पूर्ण होत नाही. परिणामी आपले वजन वाढते.
 
स्थूलता वाढते : रात्री उशिरा भूक लागल्यावर बर्‍याचदा हवे ते खाल्ले जाते. त्यावेळी वजन वाढेल याचा विचार केला जात नाही. यामुळे चयापचयाच्या वेगात बदल होतो. दिवसा जेवतो, तेव्हा शरीराची काही ना काही हालचाल होत राहाते. पणरात्री झोपताना चयपचयाचा वेग कमी होतो. त्यामुळे रात्री उशिरा आपण जे काही खाऊ ते अत्यंत कमी वेगाने पचते आणि त्यामुळे वजन वाढते.
 
पित्तप्रकोप : रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही आणि अन्न पचण्यासाठी आवश्यक आम्ल पुन्हा अन्ननलिकेत जाते. त्यामुळे अपचन होते. सातत्याने हे होत राहिल्यास गरगरणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्‌भवतात.
 
उच्च रक्तदाब : रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.
 
रात्री उशिरा जेवल्याने झोपेशी निगडित समस्याही निर्माण होतात. रात्री उशिरा जेवणार्‍या लोकांमध्ये चिडचिडेपणावाढू शकतो.
 
डॉ. योगेश चौधरी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या, सर्दी घरातील खवखव पासून आराम मिळवा

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेत हे बदल दिसून येतात.

हिवाळ्यात अशा प्रकारे लवंग खा, तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतील

वैवाहिक नाते पुन्हा ताजेतवाने आणि निरोगी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments