Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणाची सुरुवात तिखट पदार्थांपासून आणि शेवट गोड पदार्थाने करावा

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:11 IST)
प्रत्येकाची सवय असते की जेवण झाले की काही गोड धोड खाण्याची. हे फार आधीच्या काळापासून चालत आले आहे. हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात देखील हे आढळून येते. गोड खाण्याविषयी सर्वांनाच त्याचे गुण ठाऊक आहे पण जेवणाच्या आधी तिखट पदार्थ का खातात हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
 
तिखट पदार्थ खाण्याचे फायदे
1 जेवण्यात तिखट पदार्थ आधी खाल्ल्यामुळे आपले पचन तंत्र क्रियाशील होतात.
 
2 संशोधकांनी सांगितल्यानुसार ज्या वेळी आपण तिखट पदार्थ खातो त्यावेळी आपल्या शरीरातून पाचक रस आणि आम्ल तयार होतात जे आपल्या अन्नाचे व्यवस्थितरीत्या पचन करण्यास मदत करतात. यावरून समजते की आपली पचनशक्ती कशी आहे. 
 
3 आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की जेवणाच्या सुरुवातीला तिखट अन्न खाल्ल्याने पोटामधील पचन तत्त्व आणि आम्ल क्रियाशील होतात, जेणे करून पचन तंत्र सुरळीत काम करतो.
 
4 जेवणाच्या सुरुवातीस आपण तिखट पदार्थ खाल्ल्याने जठर प्रसरण पावतो आणि भूक वाढते.
 
आता जाणून घ्या गोड पदार्थांचे सेवन केल्याचे फायदे
1 गोड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट आढळतं. कार्बोहायड्रेट आपल्या पचनाची प्रक्रियेस मंदावते. ह्या साठी जेवण्याचा नंतर गोड खाल्ल्याने पचनाची प्रक्रिया सुरळीत चालते.
 
2 गोड खाल्ल्याने सेरोटॉनिन हार्मोन्सची पातळी वाढते. हे एक न्यूरोट्रान्समीटरचे काम करते. ज्यामुळे आपल्याला गोड खाल्ल्यावर आपल्याला आनंद मिळते. खरं तर गोड खाल्ल्याने एमिनो ऍसिड ट्रिप्टोफेन शोषणाची क्रिया वाढवते. ट्रिप्टोफेन ला सेरोटॉनिनची पातळी वाढविण्यासाठी ओळखले जाते. सेरोटॉनिन एक न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करत असते. ह्याचे कार्य आपल्याला आनंद मिळवून देणे आहे. म्हणून तर गोड खाऊन आपल्याला आनंद होतो.
 
3 कधी कधी आपण काहीवेळा जास्त जेवून घेतो अश्या स्थितीमध्ये आपल्याला हायपोग्लायसिमीयाच्या स्थिती मधून जावे लागते. या परिस्थितीत रक्त दाब (ब्लड प्रेशर) कमी होते. अश्या वेळेस जेवण्यानंतर गोड खाण्यास सांगितले जाते.
 
4 आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की जेवणानंतर गोड खाल्ल्याने आम्ल तयार होत नाही त्यामुळे पोटात जळजळ होत नाही. 
 
चेतावणी : गोड मध्ये आपल्याला साखरेचे सेवन करणे टाळले पाहिजेत. साखर आरोग्यास दुष्प्रभावी असते. साखर किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे नाही तर जाडी वाढल्या बरोबरच अजून आजारांना सामोरी जावे लागेल. आपल्याला ऑरगॅनिक गूळ खाण्यात वापरले पाहिजे. किंवा या पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करावा. नारळाची साखर किंवा ब्राऊन साखर सुद्धा वापरण्यात घेऊ शकतो.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments