Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या आयुर्वेदिक पानांचा उपयोग केल्यास सर्दी-खोकला पासून मिळेल अराम, रोगप्रतिकात्मक शक्ती वाढेल

tulsi
, गुरूवार, 11 जुलै 2024 (06:32 IST)
पावसाळ्यात अनेक जणांना सर्दी खोकला आणि ताप येतो. या समस्यांपासून अराम मिळण्यासाठी या आयुर्वेदिक पानांचा उपयोग करावा. तर जाणून घ्या कोणते आहे आयुर्वेदिक पाने आणि कसा करावा उपयोग 
 
हे दोन प्रकारची पाने आहे आयुर्वेदिक गुणांनी परिपूर्ण :
तुळशी आणि गुळवेल- हे दोघी आयुर्वेदमध्ये प्रसिद्ध जडी-बुटी आहे, जी आपल्या अनेक लाभांसाठी ओळखली जाते. हे दोन्ही पाने रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यांच्या सेवनाने सर्दी-खोकला दूर होतो.
 
असा करावा तुळशीचा उपयोग-
सर्दी खोकल्यासाठी तुम्ही 5-7 तुळशीचे पाने 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावे. जेव्हा पाणी अर्धे होईल तेव्हा ते गाळून घ्यावे आणि दिवसातून दोन वेळेस हे पाणी सेवन करावे. तसेच सकाळी आणि संध्याकाळी तुळशीचे पाच ते सहा पाने चावून खावे. तुळशीच्या पानांचा रस काढून मधासोबत सेवन करावा.
 
असा करावा गुळवेलचा उपयोग :
गुळवेलचा रस काढून पाण्यासोबत मिक्स करून दिवसातून दोन तीन कप सेवन करावा. 1/2 चमचा गुळवेल पाउडर गरम पाण्यात मधासोबत मिक्स करावी. तसेच दोन वेळेस सेवन करावे. तसेच तुळशी आणि गुळवेल सोबत देखील सेवन करू शकतात. दोन्ही जडी-बुटी उकळत्या पाण्यात भिजवाव्या.मग गाळून हे पाणी प्यावे.  
 
या गोष्टींकडे ठेवावे लक्ष्य- 
आराम करावा आणि हाइड्रेटेड राहावे. 
आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळावे.
साबण आणि पाण्याने हात धुवावे.
बाहेर जातांना मास्कचा उपयोग करावा.
आपल्या जवळपासच्या परिसर स्वच्छ ठेवावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात नारळ पाणी प्यावे का? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या