rashifal-2026

या व्हिटॅमिनची कमतरता मृत्यूला कारणीभूत ठरू शकते..

Webdunia
बुधवार, 4 मार्च 2020 (16:21 IST)
आपल्या शरीराला उर्जावान आणि निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराची गरज असते. ज्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज, कॅल्शियम, फास्फोरस, लोहची  संतुलित मात्र असते. शरीरासाठी 8 प्रकाराच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, के. आज आपण व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरते मुळे होणारे दुष्परिणाम  जाणून घेऊ या...
 
या व्हिटॅमिनची कमतरता मृत्यूला कारणीभूत ठरू शकते.
व्हिटॅमिन बी 12 किंवा सायनोकोबालामिन व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्य आणि उत्तम मज्जासंस्थेसाठी व्हिटॅमिन बी 12 किंवा  सायनोकोबालामिन अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात खाण्यापिण्याच्या सवयींमुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता बहुतेक लोकांमध्ये आढळत आहे. या व्हिटॅमिनची  कमतरता मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. व्हिटॅमिन बी 12 शाकाहारी पदार्थात कमी आढळते. प्राण्यांमधून मिळणाऱ्या अन्न पदार्थात मिळते. बी 12 दूध, दही, अंडी, मासे,  चिकन, चीज कॉड लिव्हर तेलात आढळते. व्हिटॅमिन बी 12 शरीराच्या चरबीचे ऊर्जेमध्ये रूपांतरण करते. हे डी.एन.ए. आणि लाल रक्त पेशींचे निर्माण करते. शरीराच्या प्रत्येक  भागास मज्जातंतूंना प्रथिने पुरविते. मज्जातंतू व्यवस्थितरीत्या कार्य करण्यासाठी हे गरजेचे आहे. याच्या अभावामुळे मेंदूला नुकसान होऊ शकते. त्यामुळे मृत्यू होऊ शकते.  मज्जासंस्थेसाठी बी 12 आवश्यक आहे. दर रोज च्या जेवणात माणसाला 2 .4 मिलीग्राम बी 12 ची गरज असते.
 
बी 12 च्या कमतरते चे लक्षण-
1 वजन कमी होणे
2 हृदयाचे ठोके वाढू लागणे
3 श्वास लागणे
4 थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
5 बद्धकोष्ठतेचा त्रास होणे
6 स्मरणशक्तीचा ह्रास होणे
7 पोटांचे विकार उद्भवणे
8 डोकं दुखण्याचा त्रास उद्भवणे
9 जुलाब होणे
10 रक्ताल्पता होणे
11 हात-पायाला मुंग्या येणे, हात -पायांची जळं-जळं होणे, हात-पाय थंड पडणे
12 सांधेदुखीचा त्रास होणे
 
बी12 वाढवण्यासाठी आहारात सामील करा
मासे, अंड्याचा पिवळा बलक, चिकन
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
आंबवलेले पदार्थ
भरपूर प्रमाणात पाणी
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

नैतिक कथा : लोभी सिंहाची कहाणी

Interesting facts about India तुम्हाला माहित आहे का? भारतातील हे शहर 'कॉटन सिटी' म्हणून ओळखले जाते

पुढील लेख
Show comments