Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिखट झोबंत असेल तर या उपायांनी लगेच तोंडाला आराम मिळेल

Webdunia
तिखट-मसालेदार पदार्थ खाल्ल्यास चवीला खूप चविष्ट लागते, पण आरोग्यासाठी ते चांगले नाही, खासकरून जर तुम्ही तुमच्या जेवणात लाल मिरची वापरत असाल तर. जर तुम्हाला थोडेसे मसालेदार अन्न आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांसोबत मसाला घालणे अधिक योग्य. चव आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत हे सर्वोत्कृष्ट आहे, परंतु जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना मसालेदार अन्न अजिबात सहन होत नाही, तर साहजिकच इतर ठिकाणी खाणे तुमच्यासाठी मोठे आव्हान ठरत असेल. जर तुम्हाला इतर लोकांप्रमाणे मिरचीचा मुबलक वापर करून बनवलेल्या भाजीचा आस्वाद घेता येत नसेल आणि जेवतानाच नाही तर नंतरही त्रास होत असेल तर आजचा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला जेवणाचा चटपटीतपणा सहन होत नाही, काही पदार्थ खाल्ल्यानंतर डोळ्यातून पाणी येऊ लागते, कानातून धूर येतो आणि जीभ खूप जलद जळू लागते, तेव्हा हे उपाय करून पहा, ज्यामुळे खूप लवकर आराम मिळेल.
 
मसालेदार पदार्थांमुळे जळजळ का होते?
तज्ज्ञांच्या मते, मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे रसायन असते. जेवताना ते तुमच्या टिश्यूच्या संपर्कात येताच, जळजळ होऊ लागते, ज्यामुळे जीभ जळू लागते. जिभेमध्ये TRPV1 वेदना ग्रहण करणारा असतो, त्यामुळे तो कॅप्सेसिनच्या संपर्कात येताच मेंदूला संदेश देतो की आपण काहीतरी चुकीचे खाल्ले आहे आणि त्याचा वेदना ग्रहण करणाऱ्यावर परिणाम होतो. डोळ्यांना आणि नाकातून पाणी येण्यासोबतच घामही येऊ लागतो.
 
तिखट झोबंत असल्यास काय करावे?
जिभेला तिखट वाटू लागल्यावर लगेच दूधाचे किवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करावे. दुधा कॅसीन नावाचे प्रोटीन असतं ज्यामुळे दुधाचा रंग पांढरा असतो. याचे सेवन केल्याने जळजळ दूर होते. आपण दहीचे सेवन ही करु शकता.
 
तिखट झोंबल्यावर लगेच चमचाभर साखर खाल्ल्याने जळजळ शांत होते पण यासाठी काही वेळ लागतो. अशात साखराऐवजी मधाचे सेवन करावे. कोमट किंवा नॉर्मल पाण्यात मध मिसळून प्यावे.
 
जवळ काही उपलब्ध नसल्यास या समस्येपासून सुटका करण्यासाठी लाळ काढणे देखील प्रभावी उपाय ठरु शकतं. यासाठी जीभ बाहेर काढावी आणि लाळ तयार होऊ द्यावी नंतर लाळ काढून दिल्याने लगेच आराम होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

मसाला मॅकरोनी रेसिपी

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

12 तासांत किती पाणी प्यावे? शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

पुढील लेख
Show comments