Festival Posters

कामवाली बाई पंधरा दिवस झाले येत नव्हती

Webdunia
हिम्मतराव यांच्या घरची कामवाली बाई पंधरा दिवस झाले येत नव्हती. दररोज भांडी घासून हिम्मतरावांची हालत बेकार झाली होती. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून ठेवलं होतं कोणी कामवाली असली तर पाठवून द्या म्हणुन... हालत बेकार आहे.
 
मग एक दिवस दुपारची भांडी घासून हिम्मतराव सुस्त झाले होते की तेवढ्यत दरवाजावरची बेल वाजली.....  बघतात तर शेजारीण एका बाईला बरोबर उभी होती. एकदम खूष होऊन आत बोलवतात. 
 
हिम्मतराव ड्रॉईंग रूम मध्ये बसले. शेजारीण त्या बाईला  घेऊन वहिनींबरोबर किचन रूम मधे गेल्या. शेजारीणला आपली किती काळजी आहे हा विचार करुन हिम्मतरावांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांना विश्वासच वाटत नव्हता की आजच्या काळात पण काही लोक  दुसऱ्याचं दुःख समजतात आणि मदतीला येतात. 
 
असो, तर थोड्यावेळाने तिघी बाहेर आल्या  आणि शेजारीण त्या बाईला घेऊन आपल्या घरी गेली. 
 
काम दाखवायला आली वाटतं, भेटवायला आली असणार, पैसे बियसे फायनल करायला आली असणार. असले असंख्य विचार हिम्मतरावांच्या डोक्यात आले. गडबडीत हिम्मतरावांनी बायकोला विचारलं.. कधी  पासून येणार?? 
किती पैसे मागतेय? 
बायको: कोण कधीपासून येणार?  
हिम्मतराव : अगं, कामवाली बाई कधी पासून येणार आणी फायनल किती पैसे मागतेय 
हिम्मतरावांची बायको :- ओ हॅलो !!! कोणी बाई ?  बाई-वाई येणार नाही. ती शेजारीण, त्यांच्या कामवालीला, तुम्ही घासलेली भांडी दाखवायला घेऊन आली होती. अशी चकचकीत स्वच्छ भांडी घासायची म्हणुन 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश देशमुख नाराज, बागेश्वर बाबांनी माफी मागितली

विनोद खन्ना यांची खलनायकापासून सुपरस्टार बनण्यापर्यंतची संघर्षाची आणि यशाची कहाणी

पुढील लेख
Show comments