Festival Posters

....खरच आपण सुधारलोय का ?

Webdunia
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद 
चेहऱ्यावर पसरायचा
मग सुरू व्हायचं खाणं-पिणं
गप्पाटप्पा, चेष्टा-मस्करी, चर्चा-चर्वण
एकच धमाल उडायची
दिवसदिवसभर
 
तेव्हा चेहरे वाचता यायचे
ओठच नव्हे, तर डोळेही बोलायचे
डोळेच नव्हे तर 
संपूर्ण देहबोलीच संभाषण होऊन जायची !
गळाभेटी, टाळ्यांनी
प्रेमाची कारंजी उडायची
 
निघताना ‘थांबा हो’, ‘बसा हो’
‘काय घाई आहे ?’ असा आग्रह
हस्तांदोलन, कपाळावर कुंकू
एखादी भेटवस्तू
नाहीतर काही वानोळा
दूर जाईपर्यंत हलणारे हात...
 
आता मात्र हे क्षण 
दुर्मिळ होत चालले आहेत
आता सगळा यांत्रिक मामला
भेटी-गाठींना असंख्य पर्याय आलेले 
नेटवर भेटा, बोला
नाहीतर तासन्‌तास बसा वाजवत 
मोबाईलवर 
शब्दांचे खुळखुळे !
 
....खरच आपण सुधारलोय का ?
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

निर्मात्यानं नदीत उडी घेत आयु्ष्य संपवलं; वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप

सलमान खानने त्याच्या चित्रपट निवडीच्या प्रक्रियेबद्दल सांगितले की – मी पटकथा वाचत नाही, मी फक्त ती ऐकतो

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments