Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

....खरच आपण सुधारलोय का ?

Webdunia
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून निघायचं
अचानक भेटीचा आनंद 
चेहऱ्यावर पसरायचा
मग सुरू व्हायचं खाणं-पिणं
गप्पाटप्पा, चेष्टा-मस्करी, चर्चा-चर्वण
एकच धमाल उडायची
दिवसदिवसभर
 
तेव्हा चेहरे वाचता यायचे
ओठच नव्हे, तर डोळेही बोलायचे
डोळेच नव्हे तर 
संपूर्ण देहबोलीच संभाषण होऊन जायची !
गळाभेटी, टाळ्यांनी
प्रेमाची कारंजी उडायची
 
निघताना ‘थांबा हो’, ‘बसा हो’
‘काय घाई आहे ?’ असा आग्रह
हस्तांदोलन, कपाळावर कुंकू
एखादी भेटवस्तू
नाहीतर काही वानोळा
दूर जाईपर्यंत हलणारे हात...
 
आता मात्र हे क्षण 
दुर्मिळ होत चालले आहेत
आता सगळा यांत्रिक मामला
भेटी-गाठींना असंख्य पर्याय आलेले 
नेटवर भेटा, बोला
नाहीतर तासन्‌तास बसा वाजवत 
मोबाईलवर 
शब्दांचे खुळखुळे !
 
....खरच आपण सुधारलोय का ?

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

चित्रपटाच्या सीक्वलनंतर कमल हासन 'इंडियन 3'च्या तयारीला!

केदारनाथ ज्योतिर्लिंग Kedarnath Jyotirlinga

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments