Dharma Sangrah

शून्यातून विश्व का विश्वातून शून्य....!!!!

Webdunia
शून्यातून विश्व का विश्वातून शून्य....!!!!
 
टू रुम किचन चा एखादा फ्लॅट , 
दोन चार एकर चे फार्म हाऊस,
एखादी चार चाकी गाडी आणि
भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं ,
की आपण म्हणतो , 
 
अमक्या- तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं !!
 
म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतो, पण सुखी काही दिसत नाही!
 
आपणचं म्हणतो की, आमच्या लहानपणी खूप मजा यायची.
 
खूप करमायचं, घर भरलेलं असायचं.
 
दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही.!
 
मग आता काय झालं ???
 
मजा कुठ गेली ??
 
एकटं एकटं का वाटत ??
 
छातीत धडधड का होते ??
 
कशामुळे करमत नाही ...??
 
कारण......
 
"विश्व निर्माण करण्याची " व्याख्या 
कुठेतरी चुकली.!
 
विश्व निर्माण करणं म्हणजे.
 
नाती गोती जपणं
 
छंद जोपासणं
 
पाहुणे होऊन जाणं
 
पाहुण्यांचे स्वागत करणं
 
खूप गप्पा मारणं 
 
घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढिग दिसणं 
 
खळखळून हसणं 
 
आणि...
 
काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं !
 
या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर 
 
" शून्यातून विश्व निर्माण केलं " असं म्हणावं .
 
तुम्हीच सांगा , 
 
आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली  की घट झाली .....???
 
तुमचं खर दुःख तुम्ही मोकळेपणाने 
किती जणांना सांगू शकता ????
 
असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक
आपण निर्माण करू शकलो...????
 
खूप कमी, किंबहुना नाहीच.. !!!
 
मग आपण " विश्व निर्माण " केलं का ??
 
तर नाही.... 
 
मित्र हो, 
 
रजिस्ट्री च्या कागदाच्या फायली म्हणजे
विश्व...????
 
भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व ?
 
नाही....!
 
लॉकर मध्ये ठेवलेले हिरे मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व.....????
 
मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व......????
 
नाही !! 
 
हे समजून घ्यावं लागेल ....!!!
 
मोठं बनण्याच्या  दडपणा मुळे आणि मग कामाच्या व्यापा मुळे नाती दूर जाणार असतील,
इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि 
अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील.
 
दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल....
तर.....
 
आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं ,
 
की...
 
विश्वातून शून्य.... ?????
( पु लं च्या एका‌ संग्रहातून )

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

Rajinikanth Birthday रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

१२ डिसेंबरपासून सानंदमध्ये कुटुंब कीर्तनाचे सादरीकरण होणार

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मध्ये येणार लीप; तुलसी–मिहिरचं आयुष्य आता वेगवेगळ्या वाटांवर!

अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅन्सवर रागावली

पुढील लेख
Show comments