Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तात्पर्य कथा : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको

Webdunia
गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (15:56 IST)
एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते. त्यात तो सापडला.
 
तात्पर्य : - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींना पूर्ण हक्क, समान वाटा मिळाला पाहिजे - ईशा अंबानी

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

वजन कमी करण्यासाठी डाईट मध्ये सहभागी करा ब्रोकोली, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्यात टाचांना तडे जात आहे, अवलंबवा हे घरगुती उपाय

आइस्ड टी प्यायल्याने शरीराला हे 7 फायदे होतात, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

चेहऱ्याच्या समस्येसाठी दह्याचा वापर करा फायदे आणि तोटे जाणून घ्या

Show comments