rashifal-2026

बोधकथा : भीती

Webdunia
अहमदाबादच्या महात्मा गांधी सायन्स लॅब्रोरेटरीमध्ये काही विद्यार्थी प्रयोग करत होते. प्रयोगशाळा त्या दिवसांत प्रख्यात वैज्ञानिक साराभाई यांनी नुकतीच सुरू केली होती. प्रयोगादरम्यान दोन मुलांकडून मोठी चूक झाली. 
ते दोघे खूपच घाबरले. आपल्याल आता मोठी शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांना वाटू लागले. ते भीत-भीतच साराभाईंकडे गेले. साराभाईंनी त्यांना घाबरलेले पाहून विचारले, ‘का रे, काय झाले? इतके घाबरलात का?’ एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, इलेक्ट्रॉनिक मोटर जळाली. त्यात  जरा जास्तच वीज गेली.’ हे ऐकून साराभाई भंकर संतापले. पण नंतर त्यांनी स्वत:ला सावरले आणि म्हणाले, ‘इतकंच! एवढय़ासाठी घाबरलात? प्रयोग करताना चुका ह्या होणारच. 
 
चुकल्याशिवाय कळणार कसं? पण पुढच्यावेळी प्रयोग करताना अधिक दक्षता घ्या. त्यामुळे नुकसान टळू शकतं.’ हे ऐकून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विद्यार्थी भारावून गेले. ते साराभाईंपुढे नतमस्तक झाले. 
 
वास्तविक, जी मोटार अशीच विद्यार्थ्यांच्या चुकींमुळे जळाली होती, ती खूपच महागडी होती. त्या दिवसांत बाजारात उपलब्ध देखील नव्हती. तरीही साराभाई विद्यार्थ्यांवर ओरडले नाहीत की बोल लावले नाहीत. उलट त्यांची भीती दूर केली. कारण भविष्यात प्रयोग करताना ते घाबरणार नाहीत. प्रयोग करताना त्यांनी प्रोत्साहित केलं. 
 
तात्पर्य : भीतीमुळे माणसे पुढे सरकत नाहीत, ती मागेच राहतात.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

Vasant Panchami Special Recipes वसंत पंचमी विशेष नैवेद्य पाककृती

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

Sharada Stuti या कुन्देन्दुतुषारहारधवला... वसंत पंचमीला नक्की म्हणा ही शारदा स्तुती

सुभाषचंद्र बोस यांचे ८ अविस्मरणीय प्रेरणादायी विचार, तुमचे जीवन बदलतील

पुढील लेख
Show comments