suvichar

बोधकथा : भीती

Webdunia
अहमदाबादच्या महात्मा गांधी सायन्स लॅब्रोरेटरीमध्ये काही विद्यार्थी प्रयोग करत होते. प्रयोगशाळा त्या दिवसांत प्रख्यात वैज्ञानिक साराभाई यांनी नुकतीच सुरू केली होती. प्रयोगादरम्यान दोन मुलांकडून मोठी चूक झाली. 
ते दोघे खूपच घाबरले. आपल्याल आता मोठी शिक्षा भोगावी लागेल, असे त्यांना वाटू लागले. ते भीत-भीतच साराभाईंकडे गेले. साराभाईंनी त्यांना घाबरलेले पाहून विचारले, ‘का रे, काय झाले? इतके घाबरलात का?’ एक विद्यार्थी म्हणाला, ‘सर, इलेक्ट्रॉनिक मोटर जळाली. त्यात  जरा जास्तच वीज गेली.’ हे ऐकून साराभाई भंकर संतापले. पण नंतर त्यांनी स्वत:ला सावरले आणि म्हणाले, ‘इतकंच! एवढय़ासाठी घाबरलात? प्रयोग करताना चुका ह्या होणारच. 
 
चुकल्याशिवाय कळणार कसं? पण पुढच्यावेळी प्रयोग करताना अधिक दक्षता घ्या. त्यामुळे नुकसान टळू शकतं.’ हे ऐकून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विद्यार्थी भारावून गेले. ते साराभाईंपुढे नतमस्तक झाले. 
 
वास्तविक, जी मोटार अशीच विद्यार्थ्यांच्या चुकींमुळे जळाली होती, ती खूपच महागडी होती. त्या दिवसांत बाजारात उपलब्ध देखील नव्हती. तरीही साराभाई विद्यार्थ्यांवर ओरडले नाहीत की बोल लावले नाहीत. उलट त्यांची भीती दूर केली. कारण भविष्यात प्रयोग करताना ते घाबरणार नाहीत. प्रयोग करताना त्यांनी प्रोत्साहित केलं. 
 
तात्पर्य : भीतीमुळे माणसे पुढे सरकत नाहीत, ती मागेच राहतात.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

लंचबॉक्स म्हणजे फक्त जेवण नसतं, तर तुमचं प्रेम असतं! टिफिन मध्ये द्या हे पदार्थ नवरोबा अगदी खुश होईल

नैतिक कथा : खरे सौंदर्य

ही ७ लक्षणं दिसली तर सावध व्हा! शरीर देतंय आजाराची सूचना

पंतप्रधान मोदींची 'झालमुडी'चा सगळीकडे डंका! घरच्या घरी कशी बनवायची? सोपी पद्धत जाणून घ्या

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीजशिवाय पाणी थंड ठेवण्याचे रामबाण उपाय

पुढील लेख
Show comments