Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर तुमच्या आयुष्यात अपमानाचे क्षण आले तर त्यात अडकून राग करु नका नाहीतर ध्येयापासून दूर जाल

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (11:44 IST)
एका गावात जय जय रघुबीर समर्थ असा घोष करत एक तपस्वी महात्मा भिक्षा मागत असे. ज्यांना जग स्वामी समर्थ रामदास या नावाने ओळखत होते. ते नित्यनेमाने त्यांच्या गावी जाऊन भिक्षा घेत असत. समोर उभ्या असलेल्या घरातून त्यांना भिक्षा मिळायची. नेहमी जय-जय रघुबीर समर्थच्या घोषणा देत असत.
 
एके दिवशी ते भिक्षा घेण्यासाठी एका घरासमोर उभा राहिले आणि त्याने तीच घोषणा केली. त्यावेळी घरात पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. त्यामुळे घराची मालकिन जरा रागात असून चिडचिड करत होती. त्याच रागात ती स्वामी समर्थ रामदासांना म्हणाली, तुम्ही रोज येऊन भिक्षा मागण्यासाठी कसे काय उभे राहता? कष्ट करून पैसे कमवा. 
 
त्यावर हसत हसत समर्थ म्हणाले - आई, आम्ही कोणाच्याही घरातून रिकाम्या हाताने जात नाही, काहीतरी द्या.
 
यावर त्या महिलेने ज्या कपड्याने ती स्वयंपाकघर पुसत होती तो जमिनीवर पडलेला होता, तो घाणेरडा आणि ओला कपडा उचलून रामदासजींना फेकून दिला आणि म्हणाली- जा घे, इथून निघून जा, पुन्हा येऊ नकोस. मला हा तुझा चेहरा देखील दाखवू नका.
 
रामदासजी निघून गेले. तोच घाणेरडा कापड त्यांनी आपल्या पिशवीत टाकला. ते एका मंदिरात पोहोचले. कापड काढून चांगला धुतला. नंतर त्या कपड्याने वाती तयार केल्या आणि संपूर्ण मंदिरात त्याच्या मदतीने दिवे लावले. पूर्ण मंदिर उजळून निघाले.
 
जेव्हा रामदासजींनी तो घाणेरडा कपडा धुतला त्याच वेळी त्या स्त्रीचे मनही धुतले गेले. आज मी साधूचा अपमान केला आहे, अशी तिला तिची चूक समजली. माफी मागण्यासाठी ती मंदिरात आली.
 
तिने रामदासजींचे पाय धरले आणि माफी मागितली. तेव्हा रामदासजी म्हणाले की क्षमा कसली, आमचे भक्त जे करतात ते भगवंतच करवून घेतात. आज तू मला दिलेला कापड बघ, त्याने संपूर्ण मंदिर उजळून निघाले. मग त्या महिलेला साधूची दृष्टी कशी असते हे समजले.
 
धडा: आयुष्यात कितीही मान-अपमान मिळाला तरी त्यात अडकू नका. त्यात पडला तर राग येईल. राग आपले लक्ष विचलित करेल. आपल्याला जे काही मिळेल, त्याचा योग्य वापर करता येईल, याचा विचार करणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

पुढील लेख
Show comments