Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजीत मीठ जास्त झाले असल्यास या 5 टिप्स अवलंबवा

भाजीत मीठ जास्त झाले असल्यास या 5 टिप्स अवलंबवा
Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (08:34 IST)
असं म्हणतात की मीठ असते तेव्हा कोणाचे त्याकडे लक्ष नसते. परंतु भाजीत किंवा वरणात नसल्यावर त्याची आठवण येते.भाजीत मीठ जास्त पडल्यावर कोणालाही ती भाजी खावीशी वाटत नाही. भाजीत मीठ जास्त झाले असल्यास काय करावं? आपण भाजी पुन्हा बनवू शकत नाही. भाजीत मीठ जास्त झाल्यास काय करावे चला जाणून घ्या.  
 
1 जर कोरड्या भाजीत जास्त मीठ झाले तर आपण थोडं हरभरा डाळी चे पीठ भाजून भाजीत घाला. थोड्या वेळात, भाजीची चव देखील ठीक होईल आणि ती अधिक चवदार लागेल.
 
2 रसदार भाजीत मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडं पाणी घालून उकळवून घ्या. उशीर होत असेल तर भाजीत कणकेच्या गोळ्या घालू शकता. या मुळे मीठ कमी होईल.
 
3 बऱ्याच हिवाळा चायनीज फूड मध्ये मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडस लिंबाचा रस मिसळा.अन्नातून मीठ कमी होईल आणि चव चांगली राहील.
 
4 बऱ्याच वेळा रसदार भाजीत उकडलेला बटाटा देखील घालू शकता. ऐकण्यात विचित्र वाटत असेल तरी हे प्रभावी आहे. या मुळे भाजीतील किंवा वरणातील मीठ कमी होईल 
 
5 अन्न सर्व्ह करताना शेवटच्या क्षणी कळते की भाजीत मीठ जास्त झाले आहे या साठी आपण भाजीत ब्रेडचा तुकडा घाला आणि सर्व्ह करताना हळूच काढून घ्या. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

केळीच्या पानांचा रस तुमच्या आहारात समाविष्ट करा, फायदे जाणून घ्या

तुळशीने बनवा हे 4 सोपे फेस पॅक, घरी मिळेल सलूनसारखी चमक

कडक उन्हातून घरी परतल्यानंतर या 5 गोष्टी करू नका, आजारी पडू शकता

हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या

काकडीच्या सालीने झुरळांपासून सुटका मिळेल, हा उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments