Publish Date: Wed, 08 Feb 2023 (22:31 IST)
Updated Date: Wed, 08 Feb 2023 (22:33 IST)
प्रत्येक घरात चपातीचा वापर केला जातो. हा फक्त लंच आणि डिनरचा एक महत्त्वाचा भाग नाही, तर बर्याच लोकांना नाश्त्यातही ते खायला आवडते. बर्याच वेळा आपण चपाती किंवा पोळ्या बनवतो, त्यावेळी ती मऊ असते, पण लवकरच ती कडक होते. अशा स्थितीत ते पुन्हा खावेसे वाटत नाही. तथापि, जर तुम्हाला तुमच्या रोट्या जास्त काळ मऊ ठेवायच्या असतील तर तुम्ही काही छोट्या टिप्सचा अवलंब करा.
पिठात तेल घाला -
जर पोळ्या जास्त काळ मऊ ठेवायच्या असतील तर पीठ मळताना गव्हाच्या पिठात थोडे तेल घालावे. कणिक मळताना तेल घातल्यास चपात्या तव्यावर लवकर शिजण्यास मदत होईल. अशा परिस्थितीत पोळ्या बराच काळ मऊ राहतात.
दूध वापरा-
दूध वापरल्याने पोळ्यां दीर्घकाळ मऊ राहण्यास मदत होते.बाहेर कुठे जात असाल आणि पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवायच्या असतील तर पाण्याऐवजी पीठ दुधाने मळून घ्या. दुधामुळे पीठ मऊ होते आणि पोळ्या जास्त काळ मऊ राहतात.
मऊ पीठ -
पोळ्या कश्या बनतील हे सर्व काही मळलेल्या कणिक वर अवलंबून असते. अनेक वेळा आपण घाईघाईने पीठ मळून घेतो आणि तुलनेने कमी पाणी घालतो. असे केल्याने पीठ घट्ट होते आणि नंतर पोळ्या देखील जास्त काळ मऊ राहत नाहीत. मऊ आणि गुळगुळीत पीठ मळून घेण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घालावे. तथापि, जास्त पाणी घालू नये याची काळजी घ्या कारण यामुळे रोल केलेल्या रोट्या तुटू शकतात. तसेच, किमान 10-15 मिनिटे मळून घ्या आणि पोळ्या बनवण्यापूर्वी थोडा वेळ राहू द्या.