Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips:कौटुंबिक कारणांमुळे जोडप्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (14:05 IST)
जोडप्यांमध्ये विभक्त होणे किंवा कधीकधी वाद होणे सामान्य आहे.दोघांमध्ये समजूतदारपणा असल्याने नाते टिकवणे सोपे जाते. परंतु अनेक वेळा जोडप्यांच्या कुटुंबीयांमुळे त्यांच्यातील दुरावा वाढतो. अनेकदा कुटुंबामुळे पती-पत्नीमध्ये भांडणे होऊ लागतात. 
 
तुमच्या नात्यात कौटुंबिक हस्तक्षेप असेल तर संबंध बिघडू शकतात. विवाहित लोकांमध्ये कौटुंबिक घटक सामान्य आहे. कधी कधी सासू-सासरे, भावजय, भावजय, वहिनी इत्यादींमुळे पती-पत्नीमध्ये मतभेद होतात.अशा स्थितीत पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो.
 
 तुमच्या जोडीदारासोबतचे नाते बिघडत असेल, तर काही टिप्स अवलंबवून  गैरसमज दूर करून नाते दृढ करता येऊ शकते. 
 
1 जोडीदाराशी बोला
मग ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो वा नवरा-बायको, नाते घट्ट राहण्यासाठी आणि एकमेकांना तुमच्या भावनांची जाणीव करून देण्यासाठी एकमेकांशी बोलणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात जर तुमच्या दोघांमध्ये काही वाद होत असतील तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी नीट बोला. तुमच्या जोडीदाराला सांगा की तुमचे कुटुंबासोबतचे नाते कसे आहे आणि तुम्हाला देखील ते नातं जपायचं आहे. बोलून प्रश्न वाढत नाही तर कमी होतात म्हणून एकमेकांशी बोलून मतभेद दूर करा. 
 
2 संपूर्ण माहिती द्या
अनेकदा लोक आपल्या जोडीदारासोबत अनेक गोष्टी शेअर करत नाहीत कारण त्यांना वाटते की छोट्या गोष्टी काय बोलावे. नंतर, जेव्हा या गोष्टी मोठ्या होऊ लागतात, तेव्हा तुम्हाला काहीही न बोलणे आणि सुरुवातीपासूनच जोडीदारापासून गोष्टी लपवणे, केवळ नात्यात दुरावा करू शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच जोडीदाराच्या कुटुंबाशी तुमचे नाते कसे आहे, कुटुंबासोबत काय घडले, हे सारे पार्टनरला सांगा.
 
3 कुटुंबाशी बोला-
कुटुंबामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव वाढत असेल तर आधी तुमच्या जोडीदाराशी बोला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांशी एकत्र बोला. समोरासमोर बसून समस्या काय आहे आणि ती कशी सोडवता येईल हे घरच्यांना विचारा, जेणेकरून नात्यात दुरावा येणार नाही. 
 
4 मोकळीक द्या-
जोडीदारासोबतचा तणाव खूप वाढू लागतो आणि तो तुमचं ऐकायला तयार नसेल तर . त्यांना काही दिवस मोकळीक द्या. असे होऊ शकते की तुमच्या शिवाय त्याला तुमची कमतरता जाणवते आणि त्यादरम्यान तो तुमची गोष्ट आणि बाजू समजू शकेलं. असं केल्याने दोघांमधील तणावही कमी होईल.
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

फ्रिझी आणि कुरळे केस मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

पुढील लेख
Show comments