Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुखी वैवाहिक जीवनासाठी या गोष्टींची काळजी घ्या

Webdunia
शनिवार, 12 मार्च 2022 (20:15 IST)
लग्नाच्या नंतर सुरुवातीचा काळ खूपच विलक्षणीय असतो. दोघांनी घालवलेले ते क्षण अविस्मरणीय असतात. सुरुवातीचा हा काळ खूप आनंदात जातो. काही महिन्यानंतर दोघं आपापल्या कामात व्यस्त झाल्यावर एकमेकांना वेळ कमी देतात. लग्नाच्या काही काळानंतर वैवाहिक जीवनातून रोमान्स कमी होतो आणि नात्यात दुरावा येऊ लागतो. वैवाहिक जीवनात राहतात फक्त तक्रारी. अशा परिस्थिती जोडप्यांमध्ये भांडण होऊ लागतं.आणि काही लोक आपल्या वैवाहिक नात्याला कायमचं संपवतात. पण अशा काही टिप्स आहे ज्यांना अवलंबवून आपण आपल्या वैवाहिक नात्यातील गोडवा टिकवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. नात्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या. 
 
सुखी वैवाहिक जीवनासाठी टिप्स- 
1  आयुष्यात प्रत्येकाचं काही न काही ध्येय असतात. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आयुश्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करतात.आयुष्यात आपल्या दोघांसाठी काही गोष्टी आवश्यक असतील जे मिळविण्यासाठी आपण दोघे खूप मेहनत करता, पण हे सर्व मिळवण्यासाठी आपण एकमेकांकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे अनेक जोडप्यांमध्ये समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत, आपल्या  आयुष्यात अशीच समस्या येत असेल तर एकमेकांशी त्याबद्दल बोलले पाहिजे.
 
2 आयुष्यात आपण जे विचार करता तसेच घडणारच असे नाही. अनेकवेळा आपण आपले स्वप्न विसरून लग्न करता, पण नंतर या गोष्टींमुळे जोडीदाराशी भांडण होते. त्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण होतो, सर्व काही विसरून आपण  वैवाहिक जीवन आणि जीवनसाथी या दोघांचाही स्वीकार करा आणि  मनातील विचारांना काढून टाका.
 
3आजकाल जोडप्यांना जो थोडा मोकळा वेळ मिळतो, तो वेळ ते एकमेकांशी न बोलता मोबाईलमध्ये घालवतात. आणि जोडीदाराशी संवाद होत नाही. या मुळे नात्यात अडचणी येतात.हे नात्यात दुरावा आणतात. आपण देखील आपल्या  मोकळ्या वेळेत एकमेकांना थोडा वेळ द्यावा.  यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन करावे. 
 
4 आजकाल अनेकवेळा लग्न मोडल्याच्या बातम्या समोर येतात. आजकाल हे जास्त होत आहे कारण काही दिवसात जोडप्यांचे एकमेकांबद्दलचे आकर्षण कमी होते. असे अजिबात होऊ नये. जर आपले जोडीदारामधील आकर्षण कमी होत असल्यास तर  त्यांच्याबद्दल चिडचिड होऊ लागते. या मागील कारण संवाद नसणे. या साठी एकमेकांशी बोला आणि एकमेकांसोबत वेळ घालवला नाही तर असे होऊ शकते. 
 
5 लग्नानंतर सर्व काही नॉर्मल होईलच असे नाही, कधी कधी गोष्टी आपल्या विचाराच्या पलीकडे जातात. ज्यामध्ये अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत जोडपे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागतात.अशी चूक करू नका, कोणत्याही समस्यांना घाबरू नका, कोणत्याही परिस्थितीत जोडीदाराला साथ द्या. 
 
6 वेळेच्या अभावामुळे एकमेकांसह वेळ घालवता येत नाही आणि चिडचिड होते. वेळेत वेळ काढून  एकमेकांसह बाहेर फिरायला जा. एकमेकांसह वेळ घालवा. जेणे करून आपसातील प्रेम वाढेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments