Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नक्षलवादी नेते कोबाड गांधी

Webdunia
गरीब परिस्थिती व शिक्षणाचा अभाव ही नक्षलवादाची मुख्य कारणे मानली जातात. परंतु, कोबाड गांधींसमोर अशी काहीही परिस्थिती नव्हती. तरीही ते नक्षलवादाकडे वळाले. लंडनमध्ये झालेले शिक्षण, गडगंज पैसा, दिवंगत कॉग्रेस नेते संजय गांधी यांच्याशी मैत्री ही पार्श्वभूमी असतानाही कोबाड नक्षलवादी झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना अटक करण्यात आली.

मुंबईतील एका उच्चभ्रू पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ग्लॅक्सो कंपनीतील मोठे अधिकारी होते. मुळात कुटुंबातील संस्कार व घरातील परिस्थिती पाहता कोबाड यांनाही त्याच पद्धतीने शिक्षण व संस्कार मिळाले होते.

डेहराडून येथील शाळेत त्यांचे शिक्षण झाले. कॉग्रेस नेते संजय गांधी हे त्याकाळी त्यांचे वर्गमित्र होते. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर सेंट झेव्हीयर्स महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. चार्टर्ड अकाउंटंटच्या कोर्सचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनलाही गेले होते. अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ इंग्लंडमधील विविध कंपन्यांमध्येही काम केले. याच काळात डाव्या विचारांकडे ते ओढले गेले. मग त्यांनी डाव्या संघटनांमध्ये प्रवेशही केला.

कानू सांन्याल यांच्यानंतर नक्षलवादी गटांना वैचारिक खतपाणी देत आपले आयुष्य नक्षलवाद्यांसाठी समर्पित केलेले कोबाड गांधी सध्या तुरुंगात आहेत. त्यांना वर्षभरापूर्वीच अटक करण्यात आली आहे. राजकारणात उतरलेल्या कोबाड यांनी काही दिवसातच नागपूरातील गरीब आदिवासींना मदत करण्याचा निर्णय घेतला. माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचे ते सदस्य आहेत.

नक्षलवाद्यांचा प्रभाव नक्षल प्रभावित राज्यांसह इतरत्र वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. कोबाड यांना नक्षलवाद्यांचे फायनांन्सर म्हणूनही ओळखले जात. दिल्लीत त्यांना वर्षभराखाली अटक करण्यात आली असून, त्यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments