Publish Date: Wed, 29 Jun 2022 (19:56 IST)
Updated Date: Wed, 29 Jun 2022 (17:59 IST)
काही मंडळींच हे आपलं बरं असतं,
त्यांच्या अडचणीत कुणी मदतीला यावं वाटत,
कुणी आलं नाही तर दुसरे एकदम वाईट ठरतात,
आपण कधी कामी पडलो का ?हे प्रश्न मनास ना पडतात!
द्यावं लागतं हो दुसऱ्यास काही न काही सतत,
तेंव्हाच ते ही पडतात कामी, हे उगाच नाही होत,
हाच तर धर्म निसर्गाने ठरवून दिला आहे,
जे तुम्ही पेरलं ते च तर उद्या उगवणार आहे,
तेव्हा वेळीच सावरा मंडळी स्वतः ला,
द्या दुसऱ्या साठीही कधी कधी स्वतः ला,
आपल्या पुरतं तर सगळेच रोज जगतात,
पण इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!