Marathi Biodata Maker

मन म्हणजे काय हो ?

Webdunia
शुक्रवार, 26 जून 2020 (16:43 IST)
मन...मन म्हणजे काय हो ? , 
 
त्याला कोणी पाहिलं नाही , 
कसं असते ते माहीत नाही,
पण त्याला खूप मान्सनमान असतो.
 
कधी ते लिक्विड असतं,  
"मन भरलं नाही" असं म्हणतो आपण, 
 
कधी ते सॉलिड असतं, "मनावर खूप ओझं आहे", 
 
कधी ते घर होतं, "मेरे मन में रहने वाली", 
कधी ते तहानलेल असतं,  "मेरा मन तेरा प्यासा" , 
 
कोणी त्याला मोरा ची उपमा देतं, "मन मोराचा कसा पिसारा फुलला". 
 
असं हे मन आयुष्य भर आपल्याला झूलवत ठेवतं , 
कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्या च्या मनाप्रमाणे आपण वागत असतो,  
 
हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं ? , 
 
ते कधी प्रेयसी च्या तोंडातून मंदिर रूप धारण करतं 
आणि ती म्हणते "मन में तुझे बिठाके ..."
 
काही जण असतात की त्याच्या "मनात"काही रहात नाही तर काही "मन कवडे" असतात.  
 
मन दिसत तर नाही
... पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं
 तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.
 
 "मनात आणलं तर काहीही होऊ शकतं .."
 
 जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो , 
दुसऱ्या च भलं करतो,  म्हणुन म्हंटलं जातं, "मन चंगा तो .."
 
कधी हे खूप डेंजर असतं ,
 स्वतः कडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं .
 
याचा वेग मोजण्याच यंत्र अजून अस्तित्वात आलेल नाही,  
तरी लोकं म्हणतात,  "मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक".
 
"मन" दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात, पण ते निर्मळ असतं, पारदर्शक  असतं , 
 
 म्हणुन च आपण म्हणू शकतो की "मोरा मन दर्पण कहलाये."
अशा या न  दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या  "मनाला" काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात  
 
पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही तर 
त्याला काही अर्थ आहे का ? 
मग ...
"मनसोक्त" जगा ! ! आणि त्यासाठी...
       मनापासून" शुभेच्छा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

फ्लॉलेस स्किन साठी जपानी फार्म्युलाच्या या टिप्स अवलंबवा, चेहरा उजळेल

तुम्ही तासनतास इअरफोन वापरता का? कानाच्या आरोग्याविषयी माहितींकडे दुर्लक्ष करू नका

जोडीदार संशयी आहे का? नात्यातील विश्वास कसा वाढवावा सोपे मार्ग जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

पुढील लेख
Show comments