suvichar

जगणं

Webdunia
येईल साठी, येईल सत्तरी
करायची नाही कुणीच चिंता,
प्रत्येक दिवस मजेत जगायचा
वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. 
 
वय झालं म्हातारपण आलं,
उगाच कोकलत बसायचं नाही.
विनाकारण बाम लावून,
चादरीत तोंड खुपसायचं नाही.
 
तुम्हीच सांगा छंद जोपासायला,
वयाचा संबंध असतो कां ?
रिकामटेकडं घरात बसून
माणूस आनंदी दिसतो कां ?
 
पोटा-पाण्यासाठी पोरं-सुना
घर सोडून जाणारच, 
प्रत्येकाच्या आयुष्या मध्ये
असे रितेपण येणारच. 
 
करमत नाही करमत नाही
सारखे-सारखे म्हणायचे नाही,
आवडत्या कामात दिवस घालवायचा
उगाचच कुढत बसायचं नाही.
 
घरातल्या घरात वा बागेत
हिंडाय-फिरायला जायचं,
वय जरी वाढलं असलं तरी
मनपसंत गाणं मनमोकळं गायचं.
 
गुडघे गेले, कंबर गेली
नेहमी नेहमी कण्हायचं नाही,
आता आपलं काय राहिलं?
हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही.
 
पिढी दर पिढी चालीरीतीत
थोडे फार बदल होणारच, 
पोरं-पोरी त्यांच्या संसारात 
कळत नकळत गुंतणारच. 
 
तू-तू, मै-मै, जास्त अपेक्षा
कुणाकडूनही करायची नाही,
मस्तपैकी जगायचं सोडून
रोज थोडं थोडं मरायचं नाही.
 
स्वत:च स्वत:ला समजवायचं असतं
पुढे पुढे चालत राहायचं असतं,
वास्तू तथास्तू म्हणत असते
हे उमजून निरामय जगायचं असतं.
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

तुम्ही तासनतास इअरफोन वापरता का? कानाच्या आरोग्याविषयी माहितींकडे दुर्लक्ष करू नका

जोडीदार संशयी आहे का? नात्यातील विश्वास कसा वाढवावा सोपे मार्ग जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : तरंगता महाल

आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

पुढील लेख
Show comments