Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व.पु.काळे यांचे सुविचार

Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (18:01 IST)
संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ? याची त्याला भीती वाटते..
मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..
जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..
खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .. म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..
प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात.. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस.. या तिन्ही  गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो..
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..
आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की  एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

12 तासांत किती पाणी प्यावे? शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या

पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा

स्वादिष्ट मटार कोफ्ते रेसिपी

पुढील लेख
Show comments