Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परिसंवादातही साहित्यिकांची बोटचेपी भूमिका

Webdunia
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर

WDWD
लेखकांनी संतांबद्दल लिहिताना लोकश्रध्देचे भान ठेवले पाहिजे. संतांनी शिकवलेली एकात्मता हे वैश्विक जाणिवेचे अधिष्ठान असलेली एकात्मता आह े, हे ऐतिहासिक सत्य असून ते आजच्या समाजासमोर मांडताना नव्या लेखकांनी ‘अभ्यासोनी प्रगटाव े ’ असा सूर 'समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांच्या साहित्यातील सामाजिकत ा' या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आला.

संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी संत तुकारामांवर लिहिलेल्या ताज्या कादंबरीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर या परिसंवादात काय व्यक्त केले जाते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, सर्वच वक्त्यांनी या विषयाच्या कडेकडेने बोलणे पसंत केले.

साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चकार शब्दही न काढता डॉ. आनंद यादव यांच्याबाबत वारकर्‍यांनी घेतलेल्या भूमिकेशी जवळपास सुसंगत अशीच या विषयाची मांडणी वक्त्यांनी केली.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शंकर अभ्यंक र, डॉ. रेखा नार्वेक र, डॉ. सुनील चिंचोलक र, डॉ. देवकर्ण मदन यांनी आपले विचार व्यक्त केले.

बुद्धिच्याही काही सीमा असतात, असे सांगताना डॉ अभ्यंकर म्हणाल े, ‘वसुदैवं कुटुंबकम ् ’ हाच विचार सर्व संतांनी मांडला असून ज्याला भारतीय संस्कृतीतील अष्टांगांपैकी कोणत्याही अंगाचा अभ्यास करायचा असेल त्यासाठी लागणारा प्रत्येक विचार हा संत साह‍ित्यात आहे. संतांनी राष्ट्र घडविल े, हा भाग जरी महत्वाचा असला तरी संतांनी सर्वप्रथम माणूस जोडला आणि घडविला हाही भाग महत्वाचा आहे. डॉ. यादवांचा उल्लेख न करता, आजच्या ललित लेखकांनी संत साहित्यावर लिहिताना सामाजिक एकरसता निर्माण व्हावी असेच लेखन केले पाहिजे असे ते म्हणाले.

  साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चकार शब्दही न काढता डॉ. आनंद यादव यांच्याबाबत वारकर्‍यांनी घेतलेल्या भूमिकेशी जवळपास सुसंगत अशीच या विषयाची मांडणी वक्त्यांनी केली.      
डॉ. सुनील चिंचोलकर यांनी समर्थ रामदासांविषयी बोलताना, अध्यात्मिक भावना आणि ईश्वरभेटीची आस यातूनच सामाजिक समरसता संत साहित्यात जन्माला आल्याचे सांगितले. समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांनी फक्त आपल्या अभंगांतून एकात्मतेचा विचार मांडला असे नाही तर कृतीतून एकात्मता सिध्द केली. संतांच्या आत्मज्ञानाच्या अनुभूतीतून त्यांचा विशाल दृष्टीकोन विकसित झाला. अल्ला ़, खुदा आणि पीर यांचा उल्लेख करीत संत रामदासांनी मुस्लिम अष्टकेही लिहिल्याचे त्यांनी नमुद केले.

सतरावे शतक संघर्षाचे होते त्या परिस्थितीला शाश्वत मुल्यांच्या आधारे संतांनी कसे परिवर्तित केले याविषयीचा विचार डॉ. देवकर्ण मदन यांनी मांडला. समाज एकसंघ रहावा यापेक्षादेखील तो एकात्म व्हावा यासाठी संतांनी प्रयत्न केले. नीतीमान समाज निर्माण व्हावा याकरीता 'सत्य आणि असत्य यासी मन केले ग्वाह े' अशी भूमिका संतांनी घेतली होत ी, अशी आपली उंची फारच खुरटी असल्याने संतत्व पेलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजी क कार्याच ा आदर् श ह ा अभंगांमधू न मिळत ो, प्रयत्नांच े श्रेष्ठत् व अभंग च शिकवता त म्हणू न संतसाहित् य ह े अक्षरसाहित् य आह े, अस े रेख ा नार्वेक र यांन ी सांगितल े. परिसंवादा स चांगल ा प्रतिसा द मिळाल ा.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Show comments