Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संमेलनध्यक्षांचे भाषण गुलदस्तात राहणार

वेबदुनिया
शनिवार, 21 मार्च 2009 (21:52 IST)
किरण जोशी
महाबळेश्वर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवल्यामुळे त्यांच्या भाषणाच्या प्रती देण्यात येणार नाही, असा निर्णय महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे संमेलनध्यक्षांचे भाषण गुलदस्तात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून पळ काढला.

संमेलन अध्यक्षांच्या भाषणांच्या प्रती द्यावा, असे मत महामंडळाच्या बैठकीत काही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले होते. परंतु या विषयावर गोंधळ झाल्यावर प्रती न वाट्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बैठकीनंतर ठाले-पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ' महामंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. परंतु या प्रती कोणाकडे आहे याची कल्पना महामंडळला नाही. प्रती देण्याची जबाबदारी स्वागत समितीचे असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले.'

संमेलनाच्या स्मरणिकेत अध्यक्ष डॉ.यादव आणि मावळते अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर यांची छायाचित्र का नाही या प्रश्नावरही ते सामाधानकारक उत्तर देवू शकल नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला. सर्व परिस्थिती लक्षात घेवून साहित्यिक आणि प्रकाशकांनी ठाले- पाटील यांचा राजीनामा मागितला आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments