rashifal-2026

नाती सुधारण्यासाठी खूप उपयुक्त असलेल्या 5 रिलेशन टिप्स

Webdunia
गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (17:00 IST)
नातं बनवायला जेवढे सोपे आहे, त्यांना जोपासणे आणि टिकवून ठेवणे तेवढेच कठीण आहे. जीवनात आनंद केवळ चांगल्या नात्यातून येतो.  
असं म्हणतात की जोड्या वरून बनून येतात. आपलं नातं आपली बुद्धिमत्ता आणि एकमेकांच्या समजण्यावर अवलंबून आहे. अशा व्यक्तीला शोधणं ज्याच्या सह आपल्याला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे खरंच अवघड आहे.
प्रत्येक नात्यात चढ-उतार असतातच. पण ह्याचा अर्थ असा नाही की नातं तिथेच संपवून टाकायचे. त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेणे करून नाते संबंध वाचू शकतील. आज आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे नात्यात सुधारणा करता येईल.   
 
1 एकत्ररित्या जास्त वेळ घालवा- 
आपल्या जोडीदारासह जास्तीत जास्त वेळ घालवा. असं केल्यानं आपसातील विवाद दूर होतील आणि आपण चांगल्या प्रकारे एकमेकांना  समजू शकाल. अधिक वेळ देऊन आपण आपल्या जोडीदाराची अधिक काळजी घेऊ शकाल. या मुळे आपल्यामधील नांत अधिक घट्ट होईल. बाहेर फिरायला जावं, मुव्ही बघावं, नवीन गोष्टी करावं. एकमेकांची मदत करा. काही असं करावं की जे दोघांना आवडेल आणि असं केल्यानं आपल्याला आनंद वाटेल. असं काही करू नका जे केल्यानं आपल्यामध्ये तणाव वाढेल.  
 
2 एकमेकांना मोकळीक द्या-   
 
कधी कधी अशी परिस्थिती बनते की ज्यात आपण स्वतःला समजू  शकता. अशा वेळी एकटं राहावंसं वाटते. अशा वेळी आपल्या जोडीदाराला वेळ द्या. त्यांना त्यांच्या मनासारखं जगू द्या आणि  आपण देखील जीवन समजून घ्या.   एकमेकांच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ केल्यावर नातं ओझं वाटू लागत. जर आपले जोडीदार आपल्या मित्रांसह बाहेर जायचे असल्यास त्यांना अडवू नका. त्यांना मोकळीक द्या आणि मित्रांसह जाऊ द्या. आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करतो  ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या साठी त्यांचे मित्र महत्वाचे नाही. म्हणून नात्यात मोकळीक देणं महत्वाचे आहे.  
 
3 एक मेकांवर विश्वास ठेवा- 
कोणत्याही नात्यात जितके प्रेम आवश्यक आहे तेवढेच विश्वास असणे महत्वाचे आहे. जर आपल्या नात्यात संशय आला तर ते आपल्या चांगल्या नात्याला संपवून टाकणार. असं होऊ नये यासाठी एकमेकांवर विश्वास असणं महत्वाचे आहे. अन्यथा आपले नाते कठीण परिस्थितीत असू शकतात. जर एकमेकांवर प्रेम कमी आहे तरीही नातं टिकू शकत. परंतु जर एकमेकांवर विश्वासच नाही तर नातं तुटायला वेळ लागत नाही.  
असं म्हणतात की नाते हे नाजूक दोऱ्यासारखे आहे. अधिक ताणल्यावर     हे तुटणारच म्हणून  जर आपण आपलं नातं अधिक घट्ट करू इच्छिता तर नात्यात थोडी शिथिलता द्यावी.      
    
4 एकमेकांवर आसक्ती असावी-
आपण आपल्या जोडीदारावर किती प्रेम करता हे त्याला सांगणे देखील महत्वाचे आहे अन्यथा त्यांना हे कळणार नाही. असं म्हणतात की प्रेमाची कोणतीही भाषा नसते. ह्यांना शब्दांमध्ये सांगणे आवश्यक असते. म्हणून त्यांच्याशी आपलं नातं दृढ करा.
 
5 एक मेकांचे ऐका- 
कोणत्याही विषयावर वाद घालण्याऐवजी एकमेकांच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकून आणि समजून घ्या. वाद घालून कोणत्याही समस्येचे निराकरण होत नाही. अनावश्यकपणे आपण वाद करून प्रकरणाला खराब कराल. असं होऊ नये यासाठी एकमेकांचे पक्ष ऐकून आपली मते मांडा.
जर आपण बरोबर आहात तर आपला जोडीदार आपल्याला नक्की समजून घेईल. असं  केल्यानं परस्पर समजूतदारपणा चांगला होईल. त्यांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या आणि घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Holi 2026 Essay in Marathi होळी निबंध मराठी

Majha Maharashtra Nibandh Marathi महाराष्ट्राची संस्कृती

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

तानाजी मालुसरे स्मृतिदिन: कोण होते नरवीर तानाजी मालसुरे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments