rashifal-2026

नातं असं असावं -नवं विवाहित असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (08:45 IST)
एक स्त्री आपल्या आयुष्यात बऱ्याच भूमिका निभावते. एक आई, एक मुलगी, एक बहीण, मित्र इत्यादी. मुलीचे लग्न झाल्यावर तिचे संपूर्ण आयुष्य बदलते. तिच्यावर तिच्या सासरच्या लोकांची संपूर्ण जबाबदारी असते. नवऱ्याच्या म्हणण्यानुसार सासरच्या इतर मंडळींच्या मतानुसार त्यांना वागावे लागते. कधी कधी काही मुली लग्नानंतर गोंधळून जातात. अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून त्या सासरी देखील सर्वांना आपलेसारखे करून घेतात. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* आपल्या सासरच्यांची काळजी घ्या-
घरात सून म्हणजे सर्व काही असते. घराचे आनंद तिच्या आनंदावर अवलंबून असते. सासरचे लोक त्या सुनेवरच निर्भर असतात. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांना रागावू देऊ नका. त्यांची काळजी घ्या. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष्य द्या. त्यांना वेळेवर जेवण द्या. त्यांच्याशी हितगुज करा. सासू सासऱ्यांच्या औषधाची काळजी घ्या. असं केल्याने आपले नाते त्यांच्याशी दृढ होईल.
 
* लहान मुलांशी हीळून मिसळून राहा- 
घरात लहान मुलं असतील तर त्यांना प्रेमाची वागणूक द्या. त्यांची काळजी घ्या. त्यांच्या गरजा पूर्ण करा. असं केल्याने सासरच्या लोकांच्या दृष्टीत आपली चांगली प्रतिमा बनेल आणि आपल्याला अधिक प्रेम आणि मान मिळेल. आपल्याला कधी एखाद्या गोष्टींवर ऐकावे लागेल तर नाराज होऊ नका किंवा वाईट वाटून घेऊ देखील  नका.   
 
* पतीची काळजी घ्या-
लग्न करून आल्यावर ज्या प्रकारे नवरा आपली काळजी घेतो  त्याच प्रमाणे आपल्याला देखील त्याची काळजी घ्यायला पाहिजे. सकाळी ऑफिसला  जाताना त्याला काय पाहिजे काय नको, तसेच त्याच्या साठी जेवण तयार करणे, दिवसातून त्याला एकदा तरी फोन लावणे, त्यांच्या आवडीचे जेवण बनविणे. त्यांना समजून घ्या आणि त्यांचे ऐकून घ्या. असं केल्याने आपण पतीला आनंदी ठेवू शकता.  
 
* आपल्या जबाबदाऱ्यांची काळजी घ्या- 
सासरी गेल्यावर प्रत्येक मुलीने तिची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाशी सलोख्याचे नाते निर्माण केले पाहिजे. सकाळी लवकर उठणे, प्रत्येकाच्या आवडी निवडीची काळजी घेणं, स्वयंपाक करणे. सासू उठण्यापूर्वीच आपण उठावे. सासरचे गाराणे माहेरी करू नका सासरच्या काही गोष्टी माहेरी सांगू नका. असं केल्याने आई वडील आणि सासू-सासऱ्यांच्या संबंधात दुरावा येऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

Turmeric vegetable पौष्टिकतेने समृद्ध रेसिपी हळदीची भाजी

वजन कमी करण्यासाठी मखान्याचे सेवन करा

NHIDCL मध्ये व्यवस्थापक पदासाठी भरती, 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी फक्त दोन गोष्टी वापरा

पुढील लेख
Show comments