Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वसंत पंचमीच्या दिवशी का बनवतात केशरी भात? जाणून घ्या केशर भात रेसिपी

Webdunia
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (13:00 IST)
वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान केले जाते व घरात पिवळे रंगाचे जेवण बनवले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी केशरी भात म्हणजे गोड भात यासाठी केशरचा उपयोग केला जातो. तुम्हाला माहित आहे का वसंत पंचमीच्या दिवशी केशर भात का बनवाला जातो? चला जाणून घेऊ या गोड भाताची रेसिपी. 

साहित्य- 
1 कप तांदूळ 
3 ते 4 चमचे तूप 
चवीनुसार साखर 
5 कप पाणी 
केशर 
लवंग 
काजू, बादाम 
तेजपान 
हिरवी वेलची 
 
कृती 
केशरी भात बनवण्यासाठी सर्वात आधी एका वाटीत केशर भिजवून ठेवा. यानंतर तांदूळ साफ करून 30 मिनिटसाठी पाण्यात भिजवून ठेवा. एका पॅन मध्ये तूप टाकून त्यात तेजपान, वेलची, काजू आणि बादाम, टाकून चांगले भाजून घ्या. नंतर यात तांदूळ टाकणे. 2 मिनिट तांदूळ भाजून घ्यावे. तांदूळ मध्ये पाणी टाकून शिजु द्यावे. तांदूळ शिजल्यानंतर ते गाळून घ्यावे. मग परत एका पॅन मध्ये तूप टाकून त्यात साखर टाकून पाक तयार करणे. या पाकात शिजलेला भात आणि केशरचे पाणी टाकावे व मिक्स करावे जोपर्यंत सर्व पाणी आटत नाही तोपर्यंत फ़्राय करावे. काजू, बादाम टाकून भात गार्निश करावा. तुमचा केशर भात बनून तयार आहे. लक्षात ठेवाल की गोड भात बनवण्यासाठी केशरचाच उपयोग करणे.
 
वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे, पिवळे अन्न शिजवणे शुभ मानले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. हिंदू धर्म अनुसार माता सरस्वतीला केशरी भात खूप प्रिय आहे. म्हणून माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी केशरी भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments