Marathi Biodata Maker

चिमूटभर मीठ आपल्याला राहूच्या दुष्प्रभावातून मुक्त करणार

Webdunia
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:46 IST)
मिठाशी निगडित काही वास्तू उपाय करून आपण तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतात. एखाद्या खाद्य पदार्थाला किती देखील मसाले घालून चवदार केले असेल पण जर त्यामध्ये मीठ नसेल तर संपूर्ण अन्नाची चव बिघडते. मिठाचा वापर तर अन्नामध्ये करतातच, वास्तू शास्त्रात देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. 
 
मीठ कोणत्या डब्यात ठेवत आहात हे देखील बघावे. वास्तुनुसार मीठ कधीही स्टील किंवा लोखंड्याचा डब्यात ठेवू नये. मीठ नेहमीच काचेच्या भांड्यात ठेवावं. यामुळे आपल्या मिठात आद्रता देखील येतं नाही. यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी येते.
 
मिठाशी निगडित काही वास्तू उपाय करून आपण ताण आणि आजारापासून मुक्त होऊ शकता, तसेच राहूच्या दुष्प्रभावापासून देखील मुक्ती मिळेल. 
 
जर आपल्याला काही मानसिक ताण असल्यास, दररोज पाण्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. या मुळे आपण तणाव मुक्त होऊ शकता. आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल.
 
जर का आपण किंवा एखाद्या व्यक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यास, तर त्याचा झोपण्याचा ठिकाणी काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवावं. एक आठवड्यानंतर त्या मिठाला बदलून टाकावं. असे काही आठवडे करावं. हे केल्यानं त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि त्याचा तब्येतीत सुधारणा होईल.
 
रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने आपले हात पाय धून झोपावं असे केल्यानं आपला ताण दूर होईल आणि आपल्याला रात्री झोप चांगली लागणार, तसेच राहू-केतूच्या दुष्प्रभावापासून आराम मिळेल.
 
मिठाच्या खड्यांना लाल कापड्यात बांधून घराच्या मुख्य दारावर लटकवून ठेवावं. या मुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. हे वाईट दृष्टीपासून देखील वाचवतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

Saphala Ekadashi 2025 सफला एकादशी कधी? शुभ -मुहूर्त, नियम आणि महत्व जाणून घ्या

आरती मंगळवारची

मंगळवारी जेवणात हा पदार्थ नक्की बनवा, जीवनात सकारात्मकता येईल

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments