Dharma Sangrah

गायीद्वारे करा वास्तुदोष दूर

Webdunia
ज्या जमिनीवर वास्तु बांधायची असेल तेथे वासरू असलेली गाय बांधून ठेवली तर वास्तुदोष दूर होऊन बांधकाम निर्विघ्नरीत्या पार पडते.

वास्तुग्रंथ 'मयमतम' मध्ये यासंदर्भात विवरण दिले आहे. वास्तु बांधण्याअगोदर त्या जागेवर सवत्सा किंवा वासरू असलेल्या गायीला बांधावे. ती आपल्या वासराचे लाड करते तेव्हा तिचा फेस जमिनीवर पडून त्या जागेला पवित्र करतो. त्या जागेवर असलेल्या दोषांना दूर करतो. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये असे सांगण्यात आले आहे, की गाय जेथे बसून निर्भयतेने श्वास घेते, त्या जागेची सर्व पापे ती ओढून काढते -

निविष्ट गोकुलं यत्र श्वांस मुंचतिनिर्भयम्।
विराजय ति तं देश पापं चास्याप कर्षति।।

ज्या घरात गायीची सेवा होते, तेथे पुत्र पौत्र, धन, विद्या सुख ह्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गाय घरात पाळणे फारच शुभ असते. अशा घरात सर्व कष्ट दूर होतात. मुलांमध्ये भीती राहत नाही.

पद्म पुराण व कर्म पुराणात गायीला कधीही ओलांडून जाऊ नये, असे म्हटले आहे. कुठल्याही मुलाखतीपूर्वी, उच्च अधिकार्‍यांना भेटायला जाण्याअगोदर गायीच्या रंवंथ करण्याचा, हम्मा म्हटल्याचा आवाज कानात पडणे शुभ असते. मुलाबाळांच्या यशासाठी गायीची सेवा करणे एक चांगला उपाय आहे. गो सेवा आणि गोदान केल्याने मृत्यूची भीती राहत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सिगारेटसोबत तंबाखू खाणे म्हणजे गाय खाण्यासारखे का आहे, जाणून घ्या ही गोष्ट

Mahabharat महाभारतानंतर द्रौपदी आणि श्रीकृष्ण एकमेकांचे व्याही कसे बनले?

मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष योग जुळून येत आहेत, ३ राशींना सौभाग्यप्राप्ती

चतुर्थी व्रत विशेष का आहे? उपवास केल्याने काय होते?

ख्रिसमस विशेष झटपट बनवा Eggless Brownie Recipe

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments